स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

सोमवार, १८ एप्रिल, २०१६

किल्ले हरिहर

.      ⚔ रौद्र किल्ले हरिहर ⚔

🎪🎪🎪🎪__🚩__🎪🎪🎪🎪
आपल्या महाराष्ट्राला खरोखर एक भौगोलिक वारसा लाभला आहे तो म्हणजे एक सह्याद्री तर दुसरा कळसूबाई पर्वत रांग...!! दोन्ही डोंगररांगा तेवढ्याच भयानक, कातळ कड्यानी अजस्त्र रूप धारण केलेल्या, सह्याद्रीला भर म्हणून घनदाट झाडी आहे त्यामुळे सह्याद्रीमधले किल्ले आदिकच सुरक्षित झाले तर याऊलट नाशिक जवळील पर्वतरांगांमध्ये (कळसुबाई) जंगल तुलनेने कमी असले तरी इथले किल्ल्यांचे काळे कातळ लांबून जरी पहिले तरी शत्रूला कापरे भरले पाहिजेत असे एकदम अजस्त्र, भयानक व राकट रूप आहे इथल्या किल्ल्यांचे, काळे कुळकुळीत तासून तयार केल्यासारखेच जणू. इथले बहुतांशी किल्ले हे दगडातच घडवलेले गेले असल्यामुळे शिवकालीन कारागिरांचा व त्या कारागिरांच्या प्रयत्नाला शिवविचारांचा जोड साधला गेल्यामुळे  दुर्गबांधनी कशी असावी हे पाहण्यासाठी नाशिक जिल्हा एकदा भटकूनच पहा.....

भरपूर दिवसापासून किल्ले हरिहर ला भेट देण्याचा बेत केला होता परंतु तो काय लवकर झालाच नाही पण काल मात्र गडाला भेटून मनाची शांतता करून घेतली. नाशिक जिल्हयातील किल्ले तसे दुर्गभटक्यांसाठी एक आव्हानच आहे कारण इथला प्रत्येक किल्ला नैसर्गिकरित्या अगोदरच भीषण रौद्र रूप घेऊन जन्माला आला व त्यावर नंतर राजेमहाराजानी त्यावर तटबंदी घालून मुकूटरुपी जणू साजच चढविला. सकाळी लवकर उठून गाडीवरून नाशिक गाठले, नाशिकमधून हायवेने इगतपुरीला गेलो थोडा रस्ता चुकला त्यामुळे खूप धांदल झाली कारण इथल्या लोकांना हरिहर किल्लाच माहित नाही हि शोकांतिका. इगतपुरीहून त्र्यंबकेश्वर रोड ला निरगुडपाडा या खेडेगावला जाण्यासाठी फाटा लागतो, आसपासचे भीषण डोंगररांगा बगत आमची गाडी रस्ता कापत होती, वास्तविकता हा संपूर्ण भाग आदिवासी म्हणून प्रचिलीतला जातो, येतील लोकांचे राहणीमान, बोलणे हे सर्व अनुभवत आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या निरगुडपाडा या गावी पोचलो. गाडी गावातील एका जुन्या शाळेत लावून गडाची पायवाट धरली, लांबूनच गडाचा घेरा जाणून घेत गडावर कधी पोचेन याची उत्कंठा लागली होती. उन्हाचा वरून तडाखा चालूच होता पण त्याकडे लक्षच नव्हते. गायरानातील लोकांना रस्ता विचारत गडाकडे चालते राहलो, जसजस गड जवळ येईल तसतसा गडाचा दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या व दरवाजा लांबूनच दिसू लागला आता तर उत्कंठा आणखी शिगेला पोचली. एव्हाना आम्ही दोन डोंगर सर करून बालेकिल्याच्या पायथ्याशी आलो मात्र पायामध्ये कसलाच त्राण उरला नव्हता एवढे भयंकर ऊन व त्याचा चालताना होणारा त्रास.... पण हे सर्व एकाच गोष्टीपुढे विरळ व्हायचे ते म्हणजे शिगेची उत्कंठा..!!
🛡🗡🛡🗡🛡🗡🛡🗡🛡🗡🛡

गडाच्या काळ्या कातळात खोदलेल्या 60° अँगल च्या पायऱ्या व पायऱ्या चढताना काळजी घेण्यासाठी पायऱ्याच्या बाजूला तयार केलेल्या खोबण्या हे काम खरच पाहण्यासारखं आहे, पायऱ्या छोटया असल्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी लागते अन्यथा जीवाशी मुकु शकतो कारण खाली दरी आहे व इथे माती कमी पण दगडच जास्त आहेत. पायऱ्या चालून वर गेल्यावर गडाच्या पहिल्या दरवाजापाशी आपण पोचतो, गडावर यायचा हा एकमेव मार्ग आहे. दरवाजा नीट न्याहाळून आपण पुढे जावे कातळकडा कोरून वाकून जाण्यासाठी 5 फुटी चीर तयार केली आहे इथून जाताना योग्य काळजी घ्यावी कारण खाली सरळ कडा आहे व वारे तर भन्नाट वाहत असते. यातून थोडे पुढे गेल्यावर सरळ खडा डोंगर फोडून आतमध्ये गुहेसारखा रस्ता केला आहे.... भयग्रस्त व थरारक मार्ग. यातून आपण सावरत वर गडाच्या मुख्य दरवाजाजवळ पोचतो. दरवाजातून पुढे डाव्या बाजूने पठारावर चालते राहावे, प्रथम डाव्या बाजूला कड्यामध्ये 2 पाण्याची टाके कोरलेली आहेत ज्यात सध्या पाणी नाही व तिथे पोचता पण येत नाही, येथून पुढे गेल्यावर 3 पाण्याची मोठी टाके दिसतील पण यातील पाणी पिण्यायोग्य नाहीये , या टाक्यापासून पुढे गेल्यावर आपण गडावरील मुख्य तलावाजवळ पोचतो. याच्या समोर मारुतीची मूर्ती असून दगडी चौथर्यातून तलावात जाण्यासाठी पायऱ्या आहेत, हनुमान मंदिराच्या मागील बाजूस उघड्यावर शंकराचे शिवलिंग आहे. तलावात सध्या पाणी नाहीये. तलावापासून पुढे गडाच्या अंतिम टोकाकडे चालते व्हावे तिथे आपल्याला दारूगोळा कोठार दिसते व त्याच्या बाजूस 3 पाण्याची टाके कोरलेली दिसतील. गडावर याव्यतिरिक्त पडझड झालेल्या वाड्यांचे अवशेष व पाण्याची टाकेच जास्त पाहायला मिळतील. गडावर एक मुद्दा खूप अनुभवायला मिळाला ते म्हणजे दुर्गबांधणी करताना केला गेलेला दगडांचा अभ्यास, पाण्याची जमिनीत मुरून प्रवाह कोणत्या दिशेने होईल त्याजागी कपार्यामध्ये खोदलेले पाण्याचे टाके खरोखर विलक्षण म्हणावे लागेल.

दुर्ग भटक्यानी हा किल्ला एकदा पाहूनच या.

🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾

शब्दांकन-
✒ मनोज शिवाजीराव महाडिक
🎪..स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान..🎪
🚩⚔9890354353,  9156571313 ⚔🚩

बलाढ्य किल्ले अंतुर

.       🎪प्रतिरांगणा- किल्ले अंतुर🎪
              (ता.कन्नड, जि. औरंगाबाद)
        
         ⚔ स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान ⚔
------------------------------------------------------------
महाराष्ट्राला लाभलेल्या ऐतिहासिक वारस्यामधील असे बरेच किल्ले आहेत कि ज्यांना भरपूर इतिहास आहे, ज्यांची रचना अभेद्य आहे पण काळाच्या ओघात हे किल्ले जास्त लोकांच्या समोर आले नाहीत किंवा त्यांच्याबद्दल माहिती लिहली गेली नाही त्यापैकीच एक बलाढ्य किल्ले अंतुर....!!

कोल्हापूर प्रांतात असणाऱ्या किल्ले रांगणा सारखाच हाही किल्ला रांगण्यासारखाच भक्कम व बलाढय, याला प्रतिरांगना म्हंटले तर काही वावगे होणार नाही. या किल्ल्याचं खास वैशिट्य म्हणजे हा किल्ला जवळ गेल्याशिवाय दिसतच नाही, म्हणजे याचा फायदा शत्रू बरोबर समोर यायचा आणि किल्ल्यावरून मारा सूरू व्हायचा ज्यामुळे शत्रूची धांदळ उडायची ( किल्ला हा डोंगर रांगेच्या नैसर्गिक रचनेमूळे लवकर दिसत नाही, त्याचा फायदा किल्ल्यावर असणाऱ्या सत्तेला व्हायचा). दुसरी एक महत्वाची बघण्यासारखी गोस्ट म्हणजे रांगण्या सारखाच या किल्ल्यावर तयार केलेला महाबुरुज.......विलक्षण, अप्रतिम, बलाढय व जुंझार.

🎪🎪🎪🎪🎪🚩🎪🎪🎪🎪🎪

गौताळा अभयारण्यामध्ये अंतुर किल्ला असल्यामुळे हा किल्ला दुर्ग भटक्यांसाठी एक चांगली संधी असते,  गौताळा अभयारण्याचा परिसर पाहत आपण किल्ल्याकडे चालते व्हावे. औरंगाबाद हुन 65 KM  वरती कन्नड हे तालुक्याचे ठिकाण आहे, कन्नड गावावरून आपल्याला नागापूर या गावी 25km वर जावे लागते. नागापूर हुन 4-5KM वर अंतुर किल्ल्याचा परिसर चालू होतो.  जाताना आपल्याला एक चौकोनी उभी शिळ रस्त्यावर दिसते ज्यावर पार्शिअन भाषेत शिलालेख कोरला आहे, येथून पुढे गेल्यावर चढावर उजव्या बाजूला हनुमानाची उघड्यावर सुबक मूर्ती दिसते, येतून पुढे सर्व जंगल एरिया चालू होतो, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी, पाण्याचे तळे भरपूर पाहायला मिळतील.

आपण 2 डोंगराला वळसा मारून डाव्या बाजूला अचानक आपल्या समोर अभेद्य अश्या किल्ले अंतुर चे दर्शन घडते, बलाढ्य व बेलाग असा हा दिसणारा किल्ला पाहून मन खरेच थक्क होते, किल्ल्याची बांधणी लांबूनच आपल्याला मोहित करते एवढं भक्कम बांधकाम या किल्ल्यावर केलं आहे, या किल्ल्याचा इतिहास सांगतो कि, हा किल्ला 15 व्या शतकात मराठ्यांनी बांधला पण तो 17 व्या शतकात तो अहमदनगरच्या निजामकडे गेला तो अखेरपर्यंत.

किल्ल्याच्या महाबुरुजाच्या उजव्या बाजूने चालत गेल्यावर आपल्याला सुरवातीला डाव्या बाजूला पहारेकर्यांसाठी तयार केलेल्या देवड्या दिसतील, येथून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या भक्कम पहिल्या दरवाजात आपण पोहचतो, आजही येथील दरवाजे भक्कम चांगल्या स्तिथीत आहेत. येतून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या गोमुखी दुसऱ्या दरवाजात आपण पोचतो, या दरवाजाची निर्मिती अतिशय उत्कृष्टरित्या केली आहे, शत्रू जरी पळत आला तरी त्याला 90० अंशात वळावे लागत असल्यामुळे शत्रूचा वेग व त्वेष कमी व्हायचा. या दरवाज्यावर चक्क तोफेचे गोळेच लावलेले आहेत, तसेच दरवाज्याच्या वर पारशी भाषेत एक शिलालेख कोरला आहे जो आजही चांगल्या अवस्थेत आहे. येतून पुढे गेल्यावर आपण गडावरील पठारावर पोचतो.

🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾

गडाच्या ऊजव्या बाजूने गडाचे बुरुज व आसपासचा परिसर न्याहाळत आपण गडावरील तलावाजवळ येऊन पोचतो, तलाव हा मोठा असून आजही पूर्ण भरलेला आहे पण यातील पाणी सध्या पिण्यायोग्य नाही. तलावाच्या डाव्या बाजूला काही इमारतींचे अवशेष व एक दरवाजा दिसतो तर उजव्या बाजूला मुस्लिम बांधवांचा पिराची मस्जिद आहे. येतून पुढे टेकडीवर गेल्यावर आपल्याला धान्य कोठार, अंधारबाव(कैद खोली) पाहण्यास मिळते, यापैकी अंधारबाव ची भीषणता आत गेल्यावरच कळते, फक्त एका विटेची जागा आहे ज्यातून सूर्यप्रकाश आतमध्ये येतो......एकदम भयानक. यापासून थोडे खाली गेल्यावर गडाचे पश्चिमेकडील बुरुज व आजूबाजूचा परिसर पाहायला मिळतो. गडाच्या तटबंदीवरून पुढे गेल्यावर आपण गडाच्या मुख्य दरवाजाजवळ पोचतो, येतील 2 बुरुज व त्यातील दरवाजा हे भक्कम बांधकाम पाहायला मिळते, याच्या पुढे लागतो तो महाबुरुज.....गडावरील एक बलाढ्य भाग.

🐅🐅🐅🐅🐅🐅🚩🐅🐅🐅🐅🐅
महाबुरुजाचा  सर्व भाग व त्याखालील गुप्त दरवाजा, खंदक हे पाहून परत आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजात यायचे. गडावर एक तोफहि होती पण काही दळभद्र समाज कंटकांनी ती पळवून नेली हि खरच एक शोकांतिका.

बाकी किल्ला खरच बलाढ्य आहे, इतिहास हौसीनी, दुर्गप्रेमीनि तो अवश्य पहावा व स्मरावा. किल्ल्याचे बांधकाम अचूक व युद्धणीतीच्या अनुषंगाने योग्य असे बांधण्यात आले आहे.

🛡🛡🛡🛡🛡🛡⚔🛡🛡🛡🛡

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
---------------------------------------------------

✒माहिती संकलन/ लेखन-
शिवछावा. मनोज शिवाजीराव महाडिक
स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान
कडेगाव(सांगली).
📞9156571313
📞9890354353