. ⚔ रौद्र किल्ले हरिहर ⚔
🎪🎪🎪🎪__🚩__🎪🎪🎪🎪
आपल्या महाराष्ट्राला खरोखर एक भौगोलिक वारसा लाभला आहे तो म्हणजे एक सह्याद्री तर दुसरा कळसूबाई पर्वत रांग...!! दोन्ही डोंगररांगा तेवढ्याच भयानक, कातळ कड्यानी अजस्त्र रूप धारण केलेल्या, सह्याद्रीला भर म्हणून घनदाट झाडी आहे त्यामुळे सह्याद्रीमधले किल्ले आदिकच सुरक्षित झाले तर याऊलट नाशिक जवळील पर्वतरांगांमध्ये (कळसुबाई) जंगल तुलनेने कमी असले तरी इथले किल्ल्यांचे काळे कातळ लांबून जरी पहिले तरी शत्रूला कापरे भरले पाहिजेत असे एकदम अजस्त्र, भयानक व राकट रूप आहे इथल्या किल्ल्यांचे, काळे कुळकुळीत तासून तयार केल्यासारखेच जणू. इथले बहुतांशी किल्ले हे दगडातच घडवलेले गेले असल्यामुळे शिवकालीन कारागिरांचा व त्या कारागिरांच्या प्रयत्नाला शिवविचारांचा जोड साधला गेल्यामुळे दुर्गबांधनी कशी असावी हे पाहण्यासाठी नाशिक जिल्हा एकदा भटकूनच पहा.....
भरपूर दिवसापासून किल्ले हरिहर ला भेट देण्याचा बेत केला होता परंतु तो काय लवकर झालाच नाही पण काल मात्र गडाला भेटून मनाची शांतता करून घेतली. नाशिक जिल्हयातील किल्ले तसे दुर्गभटक्यांसाठी एक आव्हानच आहे कारण इथला प्रत्येक किल्ला नैसर्गिकरित्या अगोदरच भीषण रौद्र रूप घेऊन जन्माला आला व त्यावर नंतर राजेमहाराजानी त्यावर तटबंदी घालून मुकूटरुपी जणू साजच चढविला. सकाळी लवकर उठून गाडीवरून नाशिक गाठले, नाशिकमधून हायवेने इगतपुरीला गेलो थोडा रस्ता चुकला त्यामुळे खूप धांदल झाली कारण इथल्या लोकांना हरिहर किल्लाच माहित नाही हि शोकांतिका. इगतपुरीहून त्र्यंबकेश्वर रोड ला निरगुडपाडा या खेडेगावला जाण्यासाठी फाटा लागतो, आसपासचे भीषण डोंगररांगा बगत आमची गाडी रस्ता कापत होती, वास्तविकता हा संपूर्ण भाग आदिवासी म्हणून प्रचिलीतला जातो, येतील लोकांचे राहणीमान, बोलणे हे सर्व अनुभवत आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या निरगुडपाडा या गावी पोचलो. गाडी गावातील एका जुन्या शाळेत लावून गडाची पायवाट धरली, लांबूनच गडाचा घेरा जाणून घेत गडावर कधी पोचेन याची उत्कंठा लागली होती. उन्हाचा वरून तडाखा चालूच होता पण त्याकडे लक्षच नव्हते. गायरानातील लोकांना रस्ता विचारत गडाकडे चालते राहलो, जसजस गड जवळ येईल तसतसा गडाचा दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या व दरवाजा लांबूनच दिसू लागला आता तर उत्कंठा आणखी शिगेला पोचली. एव्हाना आम्ही दोन डोंगर सर करून बालेकिल्याच्या पायथ्याशी आलो मात्र पायामध्ये कसलाच त्राण उरला नव्हता एवढे भयंकर ऊन व त्याचा चालताना होणारा त्रास.... पण हे सर्व एकाच गोष्टीपुढे विरळ व्हायचे ते म्हणजे शिगेची उत्कंठा..!!
🛡🗡🛡🗡🛡🗡🛡🗡🛡🗡🛡
गडाच्या काळ्या कातळात खोदलेल्या 60° अँगल च्या पायऱ्या व पायऱ्या चढताना काळजी घेण्यासाठी पायऱ्याच्या बाजूला तयार केलेल्या खोबण्या हे काम खरच पाहण्यासारखं आहे, पायऱ्या छोटया असल्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी लागते अन्यथा जीवाशी मुकु शकतो कारण खाली दरी आहे व इथे माती कमी पण दगडच जास्त आहेत. पायऱ्या चालून वर गेल्यावर गडाच्या पहिल्या दरवाजापाशी आपण पोचतो, गडावर यायचा हा एकमेव मार्ग आहे. दरवाजा नीट न्याहाळून आपण पुढे जावे कातळकडा कोरून वाकून जाण्यासाठी 5 फुटी चीर तयार केली आहे इथून जाताना योग्य काळजी घ्यावी कारण खाली सरळ कडा आहे व वारे तर भन्नाट वाहत असते. यातून थोडे पुढे गेल्यावर सरळ खडा डोंगर फोडून आतमध्ये गुहेसारखा रस्ता केला आहे.... भयग्रस्त व थरारक मार्ग. यातून आपण सावरत वर गडाच्या मुख्य दरवाजाजवळ पोचतो. दरवाजातून पुढे डाव्या बाजूने पठारावर चालते राहावे, प्रथम डाव्या बाजूला कड्यामध्ये 2 पाण्याची टाके कोरलेली आहेत ज्यात सध्या पाणी नाही व तिथे पोचता पण येत नाही, येथून पुढे गेल्यावर 3 पाण्याची मोठी टाके दिसतील पण यातील पाणी पिण्यायोग्य नाहीये , या टाक्यापासून पुढे गेल्यावर आपण गडावरील मुख्य तलावाजवळ पोचतो. याच्या समोर मारुतीची मूर्ती असून दगडी चौथर्यातून तलावात जाण्यासाठी पायऱ्या आहेत, हनुमान मंदिराच्या मागील बाजूस उघड्यावर शंकराचे शिवलिंग आहे. तलावात सध्या पाणी नाहीये. तलावापासून पुढे गडाच्या अंतिम टोकाकडे चालते व्हावे तिथे आपल्याला दारूगोळा कोठार दिसते व त्याच्या बाजूस 3 पाण्याची टाके कोरलेली दिसतील. गडावर याव्यतिरिक्त पडझड झालेल्या वाड्यांचे अवशेष व पाण्याची टाकेच जास्त पाहायला मिळतील. गडावर एक मुद्दा खूप अनुभवायला मिळाला ते म्हणजे दुर्गबांधणी करताना केला गेलेला दगडांचा अभ्यास, पाण्याची जमिनीत मुरून प्रवाह कोणत्या दिशेने होईल त्याजागी कपार्यामध्ये खोदलेले पाण्याचे टाके खरोखर विलक्षण म्हणावे लागेल.
दुर्ग भटक्यानी हा किल्ला एकदा पाहूनच या.
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
शब्दांकन-
✒ मनोज शिवाजीराव महाडिक
🎪..स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान..🎪
🚩⚔9890354353, 9156571313 ⚔🚩