🚩 अभेद्य व अजिंक्य - किल्ले रामसेज 🚩
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
स्वराज्यातील प्रत्येक किल्ल्याला इतिहासाच्या पराक्रमाची झालर आहे, पैकी असे कित्येक किल्ले आहेत कि ज्यांची उंची कमी, उजाड मोकळ्या डोंगर रांगांमध्ये एकच डोंगर रांग, ज्याला भौगोलिक क्षेत्र हि कमी पण ज्यांची इतिहासात एक बलाढ्य किल्ला, ज्यांची इतिहासामध्ये सोनेरी पाने लिहिली गेली अश्या किल्ल्यांपैकी नाशिक जवळील किल्ले रामसेज ची रक्तरंजित कहाणीही तेवढीच रोमांचकारी आहे.
हा किल्ला जेवढा लहान तेवढाच त्याचा इतिहास महान आहे. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत रामसेज हा असा एकमेव किल्ला होता ज्याने मोगलांशी जवळजवळ साडे पाच वर्षे सतत झुंज दिली. मराठ्यांच्या या इतिहासाची नोंद आपल्याला मोघलांच्या दप्तरी आपल्याला लिहलेली आढळते. तसेच ज्या पराक्रमी किल्लेदाराने सतत साडे पाच वर्षे किल्ला लढवला त्याचे नाव इतिहासाला अज्ञात आहे.
🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡
नाशिक पासून पेठ गावी जाणाऱ्या रोडवर आशेवाडी हे गाव 15 km आहे, या गावात पोचल्यावर गावच्या डाव्या बाजूला अभेद्य किल्ल्याचे आपणास दर्शन होते, व इतिहासामध्ये पराक्रम गाजवलेला हा किल्ला जणू आजही तेवढ्याच हिम्मतीने, त्याच रगिने आजही आपणास स्फूर्ती, कठीण काळात योग्य लढा देऊन जगण्याची प्रेरणा देतो.
गावामध्ये गाडी पार्क करून गडाच्या उजव्या बाजूने पायवाटेने जावे, थोडे पुढे गेल्यावर आपल्याला गडाची माहिती देणारा फलक व सिमेंट मध्ये केलेला रस्ता लागेल, या वाटेने पुढे गेल्यावर ज्या ठिकाणी सिमेंट चा रास्ता संपतो व गडाची खडी चढाई सुरु होते, या ठिकाणी जांभ्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या लागतील येतून अर्धा तासाच्या रस्ता चढाई करून गेलो कि आपण गुहेतील शिवलिंगजवळ येऊन पोचतो. गडाच्या काळ्या कपारीमध्ये हि गुहा कोरली असून आतमध्ये शिवलिंग व नंदी आहे, पावसाळ्यामध्ये यामध्ये पाणी असते. या गुहेचे वैशिट्य म्हणजे याला वरती 2 फुटाचे भोक पाडले आहे जे कि गडावरील पाण्याचे टाके भरले कि त्यातून बाहेर पडणारे पाणी या गुहेमध्ये पडते. वास्तविकता या गुहेची व वरील दरवाजाची पाहणी केली असता हे भोक पहाणी करणेसाठी किंवा गडावरील पाणी बाहेर काढणेसाठी असावे असे वाटते.
गुहेपासून वरती गेल्यावर आपण दुसऱ्या गुहेत येतो, इथे गुहेमध्ये राममंदिर वसवले आहे, पूर्ण कातळात कोरलेले हि गुहा फक्त 4 खांबावर अधांतरीत आहे, या गुहेच्या खाली एक पाण्याचे टाके आहे ज्यातील पाणी पिण्यायोग्य व थंडगार आहे.
येतून पुढे गेल्यावर आपण गडाच्या पहिल्या पठारावरती येतो, येतून डाव्या बाजूला जाणार रस्ता मोकळ्या पाठरावरती जातो येथे पाण्याचे टाके पाहायला मिळतील. परत आपण मुख्य ठिकाणी यायचं, याच्या समोर एक छोटेखानी दरवाजा आहे जो खाली गुहेमध्ये जाण्यासाठी केला आहे. येतून गडाच्या मुख्य बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी उजव्या रस्त्याने जावे, याच्या उजव्या बाजूला तटबंदीमध्ये उत्कृष्ट असा दरवाजा कोरला आहे (हा गडाचा त्यावेळचा मुख्य दरवाजा होता) , आजही याच्या बांधणीचे नेमकं कारण समजू शकत नाही, हे छोटे खंदक नेमके कश्यासाठी बांधले कारण या खंदकातून खाली जाणार बोगदा गुहेमध्ये 2 फुटाचे भोक सर्व काही विचार करण्यासारखं बांधकाम आहे. येतून परत माघारी येऊन आपण बालेकिल्ल्यावर जावे, जाताना उजव्या बाजूला एक तलाव, तर त्याचा डाव्या बाजूला 5 पाण्याचे टाके आहेत, येतून वरती गेल्यावर आई भगवती चे मंदिर आहे, आतमध्ये सुबक शास्त्र धारण भगवतीची मूर्ती आहे. या मंदिरापासून वरती जात असताना उजव्या बाजूला पडक्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. येतून थोडे वर गेल्यावर डाव्या बाजूला 4 पाण्याचे टाके आहेत. आता आपण गडाच्या मुख्य बालेकिल्ल्यावर जावे, या पठारावर मुख्य वाड्याचे पडलेले अवशेष आढळतात. बांधकाम चुन्या मध्ये केलेले दिसून येते.
येतून गडाच्या पूर्वेकडील तटबंदीकडे जावे येते आपल्याला 5-6 पाण्याची टाके आढळतील व यातून पाणी बाहेर काढण्यासाठी रहाट सारखी व्यवस्था केलेली दिसते, यातील एका टाक्यात पाण्यासाठी तयार केलेले दगडी भांडे आहे ( अशी दगडी भांडे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले महिपालगडावर आढळतात)
बाकी गडावर या व्यतिरिक्त आता काही शिल्लक नाही. येतून आजुबाजूचा परिसर न्याहाळायाचा व आपल्या बापजाद्यांनी मोघलांची कशी फजिती केली असेल याचा विचार करत परतीच्या मार्गाला लागावे.
गडाच्या पूर्वेस किल्ले भोरगड चे दर्शन होते.
◆ इतिहास-
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब स्वराज्य बुडविण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात आला. नाशिक प्रांत व शहर मुगलांच्या ताब्यात होते. अशावेळी नाशिक जवळील छोटासा गड घेण्यासाठी औरंगजेबने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले. मोगलांनी गडाला वेढा घातला तेव्हा गडावर ६०० च्या आसपास मावळे होते. मोगलांनी रामशेजवर पहिला हल्ला चढवला आणि मोगल गडाला भिडले, त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली.
त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा कडक करणे, सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे, दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढवून हल्ला करणे असे अनेक उपाय केले, पण रामशेजच्या अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे उधळून लावले. मग हट्टाला पेटलेल्या शहाबुद्दीनने लाकडी बुरुज उभारून त्यावर तोफा चढवून किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली. त्यानुसार आजुबाजूची जंगल तोडून लाकडे जमावण्यात आली. त्या लाकडांचा एक प्रचंड बुरूज बनविण्यात आला. मोगलांनी त्यावरून गडावर मारा सुरू केला पण त्याचा फारसा परीणाम झाला नाही.
मे १६६२ मध्ये रामशेजचा वेढा फोडण्यासाठी संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले व मानाजी मोरे यांना ५ ते ७ हजार सैन्यानिशी पाठविले. शहाबुद्दीनने गडाजवळील गणेश गावाजवळ मराठ्यांना रोखले. दोघांमध्ये तुंबळ युध्द झाले, त्यात मोगलांनी माघार घेतली. मराठ्यांनी मोगलांचे ५०० घोडे पकडून नेले. या विजयामुळे किल्ल्यावरील मावळ्यांमध्ये उत्साह संचारला. पण या पराजयामुळे औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला रामशेजला जाण्याची आज्ञा दिली.
शहाबुद्दीनने वेढा कडक करून किल्ल्यावर परत हल्ला चढवला. त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला .त्यात राजा दलपतराय दगडांच्या मार्याने जखमी झाला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. सलग येणार्या अपयशामुळे शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला गेला. आता वेढ्याची जबाबदारी बहादूरखानावर आली. त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याची दुसरी योजना आखली. या योजने नुसार मोगलांच्या सैन्यातील एका गटाने तोफा, वाद्ये इत्यादी साहीत्य घेऊन गडाखाली एका जागी जमाव करावा.त्यामुळे या बाजूने मोगलांचा हल्ला होईल या कल्पनेने गडावरील मावळे त्या जागी जमतील. ही संधी साधून मोगलांच्या दुसर्या गटाने विरुध्द बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा. मराठ्यांना या योजनेची आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे मराठ्यांनी दोनही बाजूंना सैन्य विभागून मोगलांना सडकवून काढले आणि मोगलांच्या या योजनेवरही पाणी फिरवले.
किल्ला जिंकण्यासाठी बहादूरखान काहीही करायला तयार होता. सैन्यातील लोकांनी एक तांत्रिक पकडून आणला. त्याने खानाला सांगितले मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा साप बनवून द्या. तो मंतरून मी हातात घेईन आणि मग कुठलीही अडचण न येता मी तुमच्या सैन्याला किल्ल्याच्या प्रवेशव्दारा पर्यंत नेईन, मग विजय आपलाच. खानाने त्याच्या म्हणण्या प्रमाणे केले. एके दिवशी तांत्रिकाला आघाडीवर ठेऊन मोगल सेना गडाच्या रोखाने निघाली. ती माराच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी गडावरून गोफणीतून दगडफेक चालू केली.त्यातील एक दगड आघाडीवरच्या तांत्रिकाच्या छातीवर इतक्या जोराने लागला की, त्याच्या हातातील सोन्याचा साप उडाला आणि तांत्रिक खाली कोसळला. हे पाहून मोगल सैन्याचा धीर खचला व त्यांनी माघार घेतली.
या पराभवाने औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला वेढा सोडून जाण्याची आज्ञा दिली. या अपमानाने भडकलेल्या खानाने जातांना शहाबुद्दीनने उभारलेला लाकडी बुरुज जाळून टाकला.
त्यानंतर औरंगजेबाने कासिमखान किरमाणी या सरदाराला रामशेजवर पाठवले, पण त्यालाही गड घेता आला नाही. अशा प्रकारे एक छोटासा गड पासष्ट महिने लढवून मराठे आणि त्यांचे किल्ले ही काय चीज आहे याची चुणूक मोगलांना दाखवली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
◆शब्दांकन व माहिती संकलन-
🖋 मनोज शिवाजीराव महाडिक.
स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान, सांगली
♨9890354353
♨9156571313
manoj.swarajya96@gmail.com