गडकोट !
मराठ्यांच्या जाज्वल इतिहासामद्धे आपल्या पराक्रमाने जेवढा मावळ्यांनी इतिहास रचला तसाच इतिहास या गडकोटांचा आहे. आपल्या बुलंद, बेलाग आणि भक्कमतेने सहयाद्रीच्या कुशीत येऊन शत्रूला लढणे मुश्किल व्हायचे. सह्याद्री म्हंटल की नजरेसमोर उभा राहतो तो रौद्र अवतार, किर्रर्रर करणारी जंगल संपदा, विशाल चखोट कडे, इथे वाऱ्यालाही फिरण्याची अनुमती नाही असं भयंकर वातावरण !
छत्रपती शिवरायांनी याच भौगोलीकतेचा वापर करून नैसर्गिक कडे कपारे, डोंगरांना आकार देऊन गडकोटांची निर्मिती केली, इथली भयानकता एवढी आहे की जावळी सारख्या खोऱ्यात शिरल्यावर शत्रूला दिवसा कापरे भरत असत, आणि याच नैसर्गिकतेचा फायदा घेऊन उदयास आला तो गनिमिकाव्याचा प्रकार ! कमीत कमी सैन्य असताना निसर्गाची साथ घेऊन शत्रूला पाणी पाजणारी औलाद ही याच दरीखोऱ्यातील मातीत घडली !
मराठ्यांनी ज्यांच्या जिवावर अनेक दशके विविध बलाढ्य शाह्यांविरुद्ध आक्रमकपणे राज्य केले ते म्हणजे इथले "गडकोट". मराठ्यांच्या इतिहासाची, पराक्रमाची कवच कुंडल, मराठ्यांच्या अस्मितेची हीच ती धारतीर्थे.
ज्या राक्षसाने अफगाण मधून येऊन कमी कालावधीमध्ये दिल्ली काबीज केली त्याला महाराष्ट्र जिंकायला आपलं म्हातारपण आपलं आजारपण येईपर्यंत वाट पाहावी लागली, त्यातील काही जणांना या मराठांच्या पराक्रमी मातीत मराठ्यांनी गाढले. इथे शिव शंभुच्या लखलखत्या तलवारीने व ओजस्वी स्वाभिमानाने तयार झालेला एक एक मावळा शत्रूच्या 10-10 सैन्याला भारी होता, इथे तयार झालेला प्रत्येक मावळा आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या धन्यासाठी, आपल्या मातीसाठी मरण पाठीवर घेऊन लढत होता, वर्षोनुवर्षे भरडला जाणारा मराठा आपला स्वाभिमान नाईलाजाने व काही स्वार्थी स्वकीयांमुळे गहाण ठेवून होता, पण आई जिजाऊनी या मातीला एक शिवरूपी हिरा दिला आणि याच तेजस्वी तळपणाऱ्या हिऱ्याने अवघा मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा बुलंद केला तो कायमचाच !
शिवरायांनी आपली ध्येयधोरणे निश्चित करताना ती अमलांत आणली, आपल्याला भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्याची जाणीव होणारा व त्यादृष्टीने पाऊल उचलनारा जगातला एकमेव राजा छत्रपती शिवराय. शिवरायांनी या गडकिल्ल्यांना लढाई च्या दृष्टीने बांधकाम करून घेऊन अजून भक्कम बनवून टाकलं होतं. कित्येक किल्ले हे राजा भोज शिलाहार यांच्या काळातील होते पण या किल्य्यांमध्ये आपली बौद्धिक प्रगल्भता वापरून त्याची डागडुजी केली, गोमुखी दरवाजे, भक्कम टेहळणी बुरुज, लढाऊ बुरुज व बुरुजावर झरोके, जंग्याची निर्मिती केली. तटबंदीच्या आत चिलखती तट, बुरुजाआत देवड्या, दिंडी दरवाजे, चोर दरवाजे यांची अतिशय उपयुक्त बांधणी केली.
अश्या या गडकोटांची सध्या उपहासना चालू आहे, चालू पिढीमध्ये असलेली इतिहासाबद्दल अनावस्था, प्रशासनाच सोयीपुरतच राजकारण, गडांवर सध्या होणारे कारनामे हे इतिहासाचं विकृतीकरण व हानिकारक आहे, अश्या प्रकारांमुळे आपणच आपल्या जाज्ज्वल इतिहासाची हानी करत आहोत, त्यासाठी प्रत्येकांनी जागरूक झाले पाहिजेल. इतिहासाची कोणी हानी करू पाहत असेल तर त्याला वेळीच जाग्यावर थोपवून ठोकलं पाहिजेल. गडकिल्ले म्हणजे कोना ऐरागैऱ्याच अड्डे नव्हेत, गडकिल्ले घडवायला आपल्या बापजाद्यानी रक्ताचा अभिषेक या मातीत केलाय, कित्येक आता बहिणींच कुंकू याच मातीसाठी पुसलं गेलय याच भान आपण ठेवलं पाहिजेल. इतिहास होऊन गेला मग आता आम्ही कशाला त्याला डोक्यावर घेतले पाहिजेल अशी भूमिका असणाऱ्या ही लोकांना सांगू इच्छितो इतिहासाच जतन करणे हेही तेवढच आपलं कर्तव्य आहे.
गडकोट म्हणजे शौर्य
गडकोट म्हणजे मराठ्यांची अस्मिता
गडकोट म्हणजे मराठ्यांचा स्वाभिमान
गडकोट म्हणजे मराठ्यांचा अभिमान
#मराठ्यांची___धारातीर्थे
#गडकोट
🖋 मनोज शिवाजीराव महाडीक
सांगली.
९८९०३५४३५३