स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

गडकोट

गडकोट !

मराठ्यांच्या जाज्वल इतिहासामद्धे आपल्या पराक्रमाने जेवढा मावळ्यांनी इतिहास रचला तसाच इतिहास या गडकोटांचा आहे. आपल्या बुलंद, बेलाग आणि भक्कमतेने सहयाद्रीच्या कुशीत येऊन शत्रूला लढणे मुश्किल व्हायचे. सह्याद्री म्हंटल की नजरेसमोर उभा राहतो तो रौद्र अवतार, किर्रर्रर करणारी जंगल संपदा, विशाल चखोट कडे, इथे वाऱ्यालाही फिरण्याची अनुमती नाही असं भयंकर वातावरण !

छत्रपती शिवरायांनी याच भौगोलीकतेचा वापर करून नैसर्गिक कडे कपारे, डोंगरांना आकार देऊन गडकोटांची निर्मिती केली, इथली भयानकता एवढी आहे की जावळी सारख्या खोऱ्यात शिरल्यावर शत्रूला दिवसा कापरे भरत असत, आणि याच नैसर्गिकतेचा फायदा घेऊन उदयास आला तो गनिमिकाव्याचा प्रकार ! कमीत कमी सैन्य असताना निसर्गाची साथ घेऊन शत्रूला पाणी पाजणारी औलाद ही याच दरीखोऱ्यातील मातीत घडली !

मराठ्यांनी ज्यांच्या जिवावर अनेक दशके विविध बलाढ्य शाह्यांविरुद्ध आक्रमकपणे राज्य केले ते म्हणजे इथले "गडकोट". मराठ्यांच्या इतिहासाची, पराक्रमाची कवच कुंडल, मराठ्यांच्या अस्मितेची हीच ती धारतीर्थे.

ज्या राक्षसाने अफगाण मधून येऊन कमी कालावधीमध्ये दिल्ली काबीज केली त्याला महाराष्ट्र जिंकायला आपलं म्हातारपण आपलं आजारपण येईपर्यंत वाट पाहावी लागली, त्यातील काही जणांना या मराठांच्या पराक्रमी मातीत मराठ्यांनी गाढले. इथे शिव शंभुच्या लखलखत्या तलवारीने व ओजस्वी स्वाभिमानाने तयार झालेला एक एक मावळा शत्रूच्या 10-10 सैन्याला भारी होता, इथे तयार झालेला प्रत्येक मावळा आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या धन्यासाठी, आपल्या मातीसाठी मरण पाठीवर घेऊन लढत होता, वर्षोनुवर्षे भरडला जाणारा मराठा आपला स्वाभिमान नाईलाजाने व काही स्वार्थी स्वकीयांमुळे गहाण ठेवून होता, पण आई  जिजाऊनी या मातीला एक शिवरूपी हिरा दिला आणि याच तेजस्वी तळपणाऱ्या हिऱ्याने अवघा मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा बुलंद केला तो कायमचाच !

शिवरायांनी आपली ध्येयधोरणे निश्चित करताना ती अमलांत आणली, आपल्याला भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्याची जाणीव होणारा व त्यादृष्टीने पाऊल उचलनारा जगातला एकमेव राजा छत्रपती शिवराय. शिवरायांनी या गडकिल्ल्यांना लढाई च्या दृष्टीने बांधकाम करून घेऊन अजून भक्कम बनवून टाकलं होतं. कित्येक किल्ले हे राजा भोज शिलाहार यांच्या काळातील होते पण या किल्य्यांमध्ये आपली बौद्धिक प्रगल्भता वापरून त्याची डागडुजी केली, गोमुखी दरवाजे, भक्कम टेहळणी बुरुज, लढाऊ बुरुज व बुरुजावर झरोके, जंग्याची निर्मिती केली. तटबंदीच्या आत चिलखती तट, बुरुजाआत देवड्या, दिंडी दरवाजे, चोर दरवाजे यांची अतिशय उपयुक्त बांधणी केली.

अश्या या गडकोटांची सध्या उपहासना चालू आहे, चालू पिढीमध्ये असलेली इतिहासाबद्दल अनावस्था, प्रशासनाच सोयीपुरतच राजकारण, गडांवर सध्या होणारे कारनामे हे इतिहासाचं विकृतीकरण व हानिकारक आहे, अश्या प्रकारांमुळे आपणच आपल्या जाज्ज्वल इतिहासाची हानी करत आहोत, त्यासाठी प्रत्येकांनी जागरूक झाले पाहिजेल. इतिहासाची कोणी हानी करू पाहत असेल तर त्याला वेळीच जाग्यावर थोपवून ठोकलं पाहिजेल. गडकिल्ले म्हणजे कोना ऐरागैऱ्याच अड्डे नव्हेत, गडकिल्ले घडवायला आपल्या बापजाद्यानी रक्ताचा अभिषेक या मातीत केलाय, कित्येक आता बहिणींच कुंकू याच मातीसाठी पुसलं गेलय याच भान आपण ठेवलं पाहिजेल. इतिहास होऊन गेला मग आता आम्ही कशाला त्याला डोक्यावर घेतले पाहिजेल अशी भूमिका असणाऱ्या ही लोकांना सांगू इच्छितो इतिहासाच जतन करणे हेही तेवढच आपलं कर्तव्य आहे.

गडकोट म्हणजे शौर्य
गडकोट म्हणजे मराठ्यांची अस्मिता
गडकोट म्हणजे मराठ्यांचा स्वाभिमान
गडकोट म्हणजे मराठ्यांचा अभिमान

#मराठ्यांची___धारातीर्थे
#गडकोट

🖋 मनोज शिवाजीराव महाडीक
      सांगली.
      ९८९०३५४३५३

सोमवार, १९ मार्च, २०१८

हरजीराजे महाडीक एक पराक्रमी योद्धा

हरजी राजेमहाडीक व कर्नाटकातील हालचाली (१६८८)
राजेमहाडीक या घराण्याची वंशावळ उपलब्ध आहे.महाराष्ट्र मधील सुर्यवंशीय घराणे आहे.हरजी राजेमहाडीक हे पराक्रमी होते.शहाजीराजांची त्यानी मर्जी संपादन केली होती विजापूरकरानी हरजीराजे यांना (राजे,प्रतापराव, रायातराव) या पदव्या दील्या होत्या . . इ.स. १६६२ साली त्यांना महाराष्ट्रात आणले गेले.शिवाजीराजांशी त्यांचे प्रेम जडले आणि महाराजांनी आपली कन्या अंबिकाराणी हीच्या सोबत इ.स.१६६८ मध्ये विवाह करुन दिला .नंतर हरजी राजे हे कर्नातकात गेले आपल्या पराक्रमाने मराठ्यांचा रुबाब दरारा त्यांनी निर्मान केला .शिवाजी राजांच्या महानिर्वाणानंतर संभाजीराजांचे राज्यप्राप्तीच्या व राज्यारोहणाच्या वेळी ते हरज होते. इ.स.१६८१मध्ये हरजीराजे राजेमहाडीक कर्नातकातचे-जिंजीचे मुख्य कारभारी झाले.त्यावेळी त्यांनी जिंजी राखला म्हणुनच जिंजी नंतर उपयोगि आला मार्टिनच्या दैनंदिनीत म्हतले आहे की हरजीराजे यांना जिंजीचे प्रशासक नेमण्यामागे संभाजीराजांची दुरदुष्टी होती. एक उत्कृष्ट सेनापति म्हणून हरजीराजांचा गौरव भारतातील इतिहासात नोंदविला गेला.जिंजीचे राज्य त्यांनी औरंगजेबाचे आक्रमणापासून वाचवले .म्हैसूर आणि तमिळनाडूचंया उत्तर अर्कातपर्यंत मराठ्यांनी औरंगजबाशी निकराचा सामना दिला .
संभाजीराजांची कन्या भवानीबाई हिचे हरजीराजांचा मुलगा शंकराजी याच्याशी लग्न झाले.त्यानी शाहू महाराजांच्या सुटकेस मदत केली.नंतर शाहूराजांकडुन
कर्नाटकात त्याना कारभार मिळाला व इ.स.१७०९ ला भवानीबाईंना तारळे महालाची सनद देण्यात आली हरजी राजे गोवळकोंड्याकडील प्रदेश स्वराज्यास जोडण्याचा प्रयत्न करीत होते. इ.स.१६८८ च्या जानेवारी मध्ये ५००सैनिकांचे मदतीने कांचीवर गेले.व नंतर मार्च अखेरीस राजे त्रिचनापल्लि ते कांजीवरम या आघाडीवर गेले .त्यांची मुले
प्रतापजी ,दुर्गोजी ,शंकराजी,जयसिंग ,सुभानजी,गुणाजी उदितसिंग.........
_श्रीमंत मराठा सरदार घराणे इतिहासात खुप प्रसिद्ध होते सोळाव्या शतकात हे महाडला आले महाडवरून त्यांना राजेमहाडीक असे आडनाव पडले त्यांचा महापुरूष कृष्णाजीराजे 1614 ला युसूफ आदिलशाच्या लुटालूटीस मरण पावले त्यांच्याकडे दाभोळची मोकदमी होती.
नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरूवात झाल्यावर कृष्णाजींचे बंधू कानोजी यांना मिळाले हे ही 1650 ला युध्दात मरण पावले.त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराज्यांस कर्नाटकात मदत करीत असताना मरण पावले शहाजीराजेंनी हरजीराजेंवर चांगलेच लक्ष होते .
___ मुलगा हरजीराजे राजेमहाडीक हे शिवरायांचे विश्वासू व सरदार होते जी मोहीम द्यावी ती यशस्वी करून येयचे छञपती शिवाजी महाराज यांनी हरजी राजेमहाडीक यांच्या कामगीरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला .
त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने 1668 ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती दिला व विवाह संपन्न झाला पुढे शिवरायांचा मृत्यू 1680 ला झाला या नंतरही ते छञपती संभाजी महाराज यांच्याबरोबर इमानाने वागले दक्षिण भारताची जबाबदारी शिवरायांनी यांच्याकडे ठेवली होती ती संभाजीराजेंनी यांच्याकडेच ठेवली ___.
पुढे हरजीराजे कांचीवर चाल करून गेले त्यांच्या पराक्रमापुढे कांची ही नमली कांची जिंकून घेतली संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर छञपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी हरजीराजेंनी जिंजीत शौर्य पराक्रम गाजवले.
नंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फीफिरखान जिंजीत चालून आल्यावर घमासान सुरू असलेल्या युध्दात 29 सप्टेंबर 1689 ला तोफेचा गोळा लागून जिंजी कर्नाटक येथे वीर मरण आले. _____पुढे सातारहून 20 मैलावर महाडीक इनाम असलेले वतन महाडकांचे असलेले तारळे गावी 1708 ला भेटले व वसवले अंबिकाबाईंचे पुञ शंकरजी राजेमहाडीक यांना छञपती संभाजी महाराज यांची मुलगी भवानीबाई दिल्या होत्या . शंकरजी राजेमहाडीक यांचा युध्दात मृत्यू झाल्या नंतर भवानीबाई तारळे नदीकाठी सती गेल्या..
त्याचे राजेमहाडीक वंशज भानजी हरजी राजेमहाडीक आणि मी ,तारळे.येथे याच्याशी भेट होऊन चर्चा झाली.