स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

बुऱ्हाणपुरची लूट (बुऱ्हाणपूरची लढाई)

.               *बऱ्हाणपूरची लढाई*
________________________________

इतिहास लेखन : मनोज शिवाजीराव महाडिक     
_________________________________

  (30 जानेवारी 1681)

मराठ्यांनी शंभू छत्रपतींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सुरत लुटायचा बहाणा शत्रूगोटात केला, मात्र मराठ्यांचा इरादा वेगळाच होता सुरत ऐवजी बुऱ्हाणपूर लुटायचा मराठ्यांनी ठरवले. बऱ्हाणपूरचा सुभेदार औरंगजेबाचा दुधभाऊ खानजहान बहादूरखान कोकलताश आपल्या पुतन्याच्या लग्नासाठी औरंगाबाद ला 4 दिवसापुर्वी 3000सैन्य घेबून गेला होता, याच मोक्याच्या जटक्यात बुऱ्हाणपूरावर हल्ला करायचे ठरवले. आता बुऱ्हाणपूर चा नायब सुभेदार होता काकरखान.

दुपारच्या वेळेस ठाणेदार धावत धावत काकरखानजवळ येऊन सांगू राहिला की गेल्या 2 दिवसापासून सुरत जवळच्या जंगलात त्यांना मराठ्यांची घोडी व सैनिक दिसले म्हनुन, आता मात्र काकरखान चांगलाच भिला होता कारण कोकलताश ही नव्हता व तो सोबत सैन्य घेऊन गेल्यामुळे काकरखान जवळ फक्त 5000 सैन्य बुऱ्हाणपूर मध्ये होते. संभा आता सुरत लुटणार या विचाराने तेथील गावकरी, व्यापारी, परदेशी वखारवाले चांगलेच भिले होते कारण 20 वर्षांपूर्वी पहिली लूट तर परत त्याच सुरतेवर 12 वर्षांपूर्वी दुसरी लूट शिवरायांनी केली होती आता त्याच सुरतेवर परत 12 वर्षांनी शिवाचा बछडा संभा आलाय या निरोपाने सगळेच मोघल निम्मे गार झाले होते.

सुरतच्या ठाणेदाराने काकरखान ला सैन्य मराठे हल्ला करण्याअगोदर तातडीने सैन्य पाठवायला सांगितले, काकरखान ने सहकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने 4000 सैन्य व तुंबळ असा दारुगोळा सुरत च्या दिशेने पाठवला,  काकरखानचे सैन्य निम्म्यात पोचलो तोवरच सायंकाळी त्याचे 4-5 जासूद धावत आले व म्हणाले " हुजूर घात झाला मरहट्टे सुरत ऐवजी बुऱ्हाणपुरावर चाल करून आलेत" आता मात्र काकरखान कळायचे बंद झाले, त्याला समजतच नव्हते की आताच शंभू छत्रपतींचा राज्याभिषेक 15 दिवसारपूर्वीच झाला होता आणि त्यात ही रायगडावरून बुऱ्हाणपूर ला यायला कमीत कमी 6 दिवस लागतात दिवस रात्र घोडी दौडली तर, तो विचारच करत होता, त्याला भीती वाटायला लागली तो मनोमनी कोकलताश ला शिव्या देऊ राहिला.
सायंकाळी परत 2 जासुस आले आणि काकरखान ला माहिती दिली की इथून 3 कोसावरील जंगलात मराठ्यांनी तळ ठोकला आहे व ते उद्या सुर्योदय होण्याच्या अगोदर बऱ्हाणपूर लुटून नेणार होते, आता मात्र काकरखान गारठला पण जबाबदारी या नात्याने तो थोडासा सावरलाही, बऱ्हाणपूरातील व्यापारी, गर्भ श्रीमंत लोक सोन्याच्या मोहरा, दागिने घेऊन काकरखान जवळ येऊन वाचवण्यासाठी विनवण्या करू लागली.
काकरखानानाने बुऱ्हाणपूरतील सर्व व्यापाऱ्यांजवळचे लोक एकत्र केले व एकूण 2000 ची फौज तयार केली व मराठे सकाळी हल्ला करायच्या अगोदर आपण रात्रीच मराठयांनवर हल्ला करून त्यांना संपवायचं असा डाव त्याने केला व ठरल्या प्रमाणे मध्यरात्री 1000 घोडदळ व 1500 भूदळ सैन्य बाहेर पडले.

बुऱ्हाणपूरच्या रक्षणासाठी मधरस्त्यात एक खंदक खोदला होता, काकरखान ची 500-600 ची पहिली तुकडी पुढे होती, या खंदका मध्ये पूर्वी संकट आले की लाकडे टाकून वेटवून देऊन सरंक्षण केलं जायचे, आता मोघलांच्या कापाळावरून ऐन गारठ्यात घाम फुटला होता, तुकडीच नेतृत्व स्वतः काकरखान करतं होता. खंदकाच्या पलीकडे जंगल होते जिथे मराठ्यांनी तळ ठोकला होता.

काकरखान जरा भीतभितच पण त्याला फौज असल्यामुळे बळ आले होते आशा अवस्थेत तो खंदका जवळ पोचला, त्याला मात्र तिथे कसलीशी कुजबुज जाणवली, तो सैनिकाना सावध होण्याच्या इशारा देणार याच्या अगोदर लपून बसलेले मराठ्यांची घोडी बाहेर पडली व एकच हल्ला कल्लोळ माजला, हर हर महादेव चा नारा गाजला, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय म्हणत मराठे मोगलांवर तुटून पडले. हाना sss मारा sssss म्हणत सपासप वार होऊन धरतीला रक्ताभिषेक होऊ लागला, काकरखानाचे 500-600 सैन्य पुरतेच गारद झाले तसा काकरखानाने पळून जाऊ लागला.

याचवेळी शेजारच्या जंगलात दुसऱ्या मोहिमेसाठी आलेल्या सरसेनापती हंबीर मामांना बऱ्हाणपूरच्या दिशेने हर हर महादेव चा नारा ऐकू आला तसा त्या तुकडीतले सगळे सैन्य हंबीर मामांनी एकत्र केले पण पाहिले त्यांना वाटलं हा शत्रूचा डाव असेल ते आपली दिशाभूल करत असतील पण जंगलातून 10-12 घोडेस्वार हंबीर मामांच्या दिशेने आले व त्यांनी हंबीर मामांना जेंव्हा सांगितले की या मोहिमेवरती स्वतः युवराज छत्रपती आहेत हे कळल्यावर हंबीर मामासंह सगळ्या सैन्याची छाती फुलली , लागलीच सैन्य बुऱ्हाणपूर च्या दिशेने धावत सुटले व आपल्या सैन्याला मिळाले मग मात्र मराठ्यांनी संपूर्ण बऱ्हाणपूर ला वेढा घालून नाकाबंदी केली, व व्यापाऱ्यांनि घरात लपवून ठेवलेले सोने नाणे कुदळी खोऱ्याने व पारेने काढून लुटले. संबंध 3 दिवस लूट चालू होती, याच मोहिमेत शंभूराजांनी जवळच्या बाजारातून सौदागर उस्मान कढुन 2000 अफगाणिस्तान मधले घोडे विकत घेऊन घोडदळ अजून भक्कम केले.
छत्रपती संभाजी महाराजांची राज्याभिषेकानंतरची ही पहिलीच मोहीम होती ती अपेक्षेपेक्षा त्यांना जास्तच यशस्वी वाटली !

एक कोटभर रकमेची दौलत घेऊन सैन्य 4 तुकड्या कडून 4 दिशेने किल्ले साल्हेर च्या दिशेने रवाना झाले, तिकडे मात्र कोकलताश ला निम्म्या रस्त्यात ही बातमी समजली तो मध्यातूनच आपल्या पुतण्याच्या लग्नाला न जाता बुऱ्हाणकडे अंतर काटू राहिला तोपर्यंत मराठे बऱ्हाणपूरातून निसटले होते !

________________________________

🖋 इतिहास वर्णन व शब्दांकन :
      मनोज शिवाजीराव महाडिक
      स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान, सांगली
      संपर्क : ०९८९०३५४३५३
      मेल: manoj.swarajya96@gmail.com
__________________________________

गुरुवार, ११ मे, २०१७

सरसेनापती हरजीराजे राजेमहाडीक वाडा

गडेहो जय शंभूराजे...!!

छत्रपती शिवराय निर्मित स्वराज्य बांधणीमध्ये अनेक छोट्या मोठ्या घराण्यातील सर्वसामान्य लोकांनी मोलाची साथ देऊन प्रसंगी प्राण त्याग करून स्वराज्य निर्मितीमध्ये इतिहास कोरून ठेवला अश्या 18 पगड जातीतील सर्व परिचित, अपरिचित स्वराज्य योध्याना स्मरून हा छोटासा लेख लिहण्याचा माज्यासारख्या पामराचा हा अल्पसा प्रयत्न.

स्वराज्य बांधणीमध्ये भोसले, निंबाळकर, जाधव, घोरपडे, महाडिक, आदी घराण्यांनी आपला वेगळाच आत्मविश्वासू ठसा महाराजांच्या काळजात उमटवला होता, त्यापैकी राजे महाडिक ह्या घराण्याने आपला वेगळाच दबा स्वराज्य निर्मितीच्या काळात कर्नाटक प्रांतात उठवला.

महाडिक घराण्याला छ. शाहू महाराजांच्या काळात 7 गावांची वतनकी व सरदेशमुखकी छ. संभाजी महाराजांची मुलगी व छ. शाहूंची बहीण भवानी बाई महाडिक (शंकराजी राजेमहाडीक यांची पत्नी)  यांच्या लग्नात मिळाली होती ती खालील प्रमाणे गावे आहेत...
तारळे(जि.सातारा) ,नेवरी (जि. सांगली), चिंचणी, बोपोशी, तोंडोशी, वाजरोशी, मारुलोशी, कडवेखुर्द आणि घोट.

महाडिक घराणे प्रामुख्याने देशभरात ग्वाल्लेर, सातारा, सांगली, नागपूर, कोल्हापूर, महाड, श्रीरामपूर इत्यादी भागात बहुतांशी विखुरला गेला.

महाडिक घराण्याचा सगळा कारभार हा तारळे (ता.पाटण जि. सातारा) येथून व्हायचा, गावामद्धे सद्य परिस्तिथी मद्धे 8 वाडे अजूनही शाबूत आहेत, पैकी यातील 3/4 वाड्यामद्धे त्यांची वंशावळ राहत आहे, घराचे बांधकाम हे चुण्या मद्धे केलेले असून  कौलारी वाडे आहेत, प्रत्येक वाड्यामध्ये वृंदावन, प्रशस्त बैठकीची जागा आहेत, यातील काही वाड्यामद्ध्ये आजही सुस्थितीतील जुन्या काळातील भांडी, कपाटे, शास्त्रास्त्रे (तलवार, दांडपट्टा, खंजीर) पाहायला मिळतात, जुन्या काळात राजघराण्यातील स्त्रीयानां नेण्यासाठीची पालखी, पेठारे आजही पाहायला मिळतात.  (खाली दिलेले फोटो पहा)

गावामद्धे 8 वाड्यांबरोबर वाड्याच्या बाजूला जुने राममंदिर व मंदिरालागत जुन्या काळातील विहीर पाहण्यासारखी आहे, तसेच जुने पडझड झालेले वाडे, इतरत्र पडलेले शिल्पे, वीरगळी गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगतात. गावामद्धे 1857 च्या क्रांतिकारी बंडामध्ये हौतात्म्य पत्करलेले तोफखाना प्रमुख हैबत महाडिक( सातारचे प्रतापसिंह भोसले यांचे विश्वासू)  यांच्या स्मरणार्थ उभे केलेले क्रांती स्तंभ आहे.

गावच्या बाहेर नदीकाठी संगमावरती शंभूपुत्रिका भावाणीबाई महाडिक यांची समाधी आहे तिथे नतमस्तक व्हावे, सध्या समाधीची दुरावस्था झाली आहे, आम्ही हाराजीराजेंचे 13 वे वंशज शिवाजीराव राजेमहाडीक यांच्याशी बोलणे झाले, ग्रामपंच्यातीमार्फत समाधीसाठी कायमस्वरूपी शेड मारण्याचा निर्णय झाला आहे असं समजलं, तरीही स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान तर्फे तात्पुरते का होईना समधीपरिसर स्वछ करून त्याला पत्र्याचे शेड मारन्याचा निर्णय झाला आहे.

● इतिहास______

श्रीमंत मराठा सरदार घराणे इतिहासात खुप प्रसिद्ध होते सोळाव्या शतकात हे महाडला आले महाडवरून त्यांना राजेमहाडीक असे आडनाव पडले त्यांचा महापुरूष कृष्णाजीराजे 1614 ला युसूफ आदिलशाच्या लुटालूटीस मरण पावले त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती.
नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरूवात झाल्यावर कृष्णाजींचे बंधू कानोजी यांना मिळाले हे ही 1650 ला युध्दात मरण पावले.त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराज्यांस कर्नाटकात मदत करीत असताना मरण पावले शहाजीराजेंनी हरजीराजेंवर चांगलेच लक्ष होते .
___ मुलगा हरजीराजे राजेमहाडीक हे शिवरायांचे विश्वासू व सरदार होते जी मोहीम द्यावी ती यशस्वी करून येयचे छञपती शिवाजी महाराज यांनी हरजी राजेमहाडीक यांच्या कर्नाटकातील कामगीरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला .
त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने 1668 ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती दिला व विवाह संपन्न झाला पुढे शिवरायांचा मृत्यू 1680 ला झाला या नंतरही ते छञपती संभाजी महाराज यांच्याबरोबर इमानाने वागले दक्षिण भारताची जबाबदारी शिवरायांनी यांच्याकडे ठेवली होती ती संभाजीराजेंनी यांच्याकडेच ठेवली ___.

पुढे हरजीराजे कांचीवर (कर्नाटक प्रांत) चाल करून गेले त्यांच्या पराक्रमापुढे कांची ही नमली कांची जिंकून घेतली संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर छञपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी हरजीराजेंनी जिंजीत शौर्य पराक्रम गाजवले.
नंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फीफिरखान जिंजीत चालून आल्यावर घमासान सुरू असलेल्या युध्दात 29 सप्टेंबर 1689 ला तोफेचा गोळा लागून जिंजी कर्नाटक येथे वीर मरण आले.

_____पुढे सातारहून 20 मैलावर महाडीक इनाम असलेले वतन महाडकांचे असलेले तारळे गावी  (28 गावांची वतनकी) 1708 ला भेटले व वसवले अंबिकाबाईंचे पुञ शंकरजी राजेमहाडीक यांना छञपती संभाजी महाराज यांची मुलगी भवानीबाई दिल्या होत्या . शंकरजी राजेमहाडीक यांचा युध्दात मृत्यू झाल्या नंतर भवानीबाई तारळे नदीकाठी सती गेल्या....!!

● माहिती संकलन/ लेखन-

मनोज शिवाजीराव महाडिक
रा.नेवरी ता.कडेगाव जि. सांगली
स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान, सांगली
संपर्क- 9890354353
मेल-manoj.swarajya96@gmail.com

(काही माहिती हि नेटवरून अज्ञात लेखकाची वापरली आहे, पुस्तकांचा संदर्भ घेऊन मिळवली आहे)