स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

बुऱ्हाणपुरची लूट (बुऱ्हाणपूरची लढाई)

.               *बऱ्हाणपूरची लढाई*
________________________________

इतिहास लेखन : मनोज शिवाजीराव महाडिक     
_________________________________

  (30 जानेवारी 1681)

मराठ्यांनी शंभू छत्रपतींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सुरत लुटायचा बहाणा शत्रूगोटात केला, मात्र मराठ्यांचा इरादा वेगळाच होता सुरत ऐवजी बुऱ्हाणपूर लुटायचा मराठ्यांनी ठरवले. बऱ्हाणपूरचा सुभेदार औरंगजेबाचा दुधभाऊ खानजहान बहादूरखान कोकलताश आपल्या पुतन्याच्या लग्नासाठी औरंगाबाद ला 4 दिवसापुर्वी 3000सैन्य घेबून गेला होता, याच मोक्याच्या जटक्यात बुऱ्हाणपूरावर हल्ला करायचे ठरवले. आता बुऱ्हाणपूर चा नायब सुभेदार होता काकरखान.

दुपारच्या वेळेस ठाणेदार धावत धावत काकरखानजवळ येऊन सांगू राहिला की गेल्या 2 दिवसापासून सुरत जवळच्या जंगलात त्यांना मराठ्यांची घोडी व सैनिक दिसले म्हनुन, आता मात्र काकरखान चांगलाच भिला होता कारण कोकलताश ही नव्हता व तो सोबत सैन्य घेऊन गेल्यामुळे काकरखान जवळ फक्त 5000 सैन्य बुऱ्हाणपूर मध्ये होते. संभा आता सुरत लुटणार या विचाराने तेथील गावकरी, व्यापारी, परदेशी वखारवाले चांगलेच भिले होते कारण 20 वर्षांपूर्वी पहिली लूट तर परत त्याच सुरतेवर 12 वर्षांपूर्वी दुसरी लूट शिवरायांनी केली होती आता त्याच सुरतेवर परत 12 वर्षांनी शिवाचा बछडा संभा आलाय या निरोपाने सगळेच मोघल निम्मे गार झाले होते.

सुरतच्या ठाणेदाराने काकरखान ला सैन्य मराठे हल्ला करण्याअगोदर तातडीने सैन्य पाठवायला सांगितले, काकरखान ने सहकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने 4000 सैन्य व तुंबळ असा दारुगोळा सुरत च्या दिशेने पाठवला,  काकरखानचे सैन्य निम्म्यात पोचलो तोवरच सायंकाळी त्याचे 4-5 जासूद धावत आले व म्हणाले " हुजूर घात झाला मरहट्टे सुरत ऐवजी बुऱ्हाणपुरावर चाल करून आलेत" आता मात्र काकरखान कळायचे बंद झाले, त्याला समजतच नव्हते की आताच शंभू छत्रपतींचा राज्याभिषेक 15 दिवसारपूर्वीच झाला होता आणि त्यात ही रायगडावरून बुऱ्हाणपूर ला यायला कमीत कमी 6 दिवस लागतात दिवस रात्र घोडी दौडली तर, तो विचारच करत होता, त्याला भीती वाटायला लागली तो मनोमनी कोकलताश ला शिव्या देऊ राहिला.
सायंकाळी परत 2 जासुस आले आणि काकरखान ला माहिती दिली की इथून 3 कोसावरील जंगलात मराठ्यांनी तळ ठोकला आहे व ते उद्या सुर्योदय होण्याच्या अगोदर बऱ्हाणपूर लुटून नेणार होते, आता मात्र काकरखान गारठला पण जबाबदारी या नात्याने तो थोडासा सावरलाही, बऱ्हाणपूरातील व्यापारी, गर्भ श्रीमंत लोक सोन्याच्या मोहरा, दागिने घेऊन काकरखान जवळ येऊन वाचवण्यासाठी विनवण्या करू लागली.
काकरखानानाने बुऱ्हाणपूरतील सर्व व्यापाऱ्यांजवळचे लोक एकत्र केले व एकूण 2000 ची फौज तयार केली व मराठे सकाळी हल्ला करायच्या अगोदर आपण रात्रीच मराठयांनवर हल्ला करून त्यांना संपवायचं असा डाव त्याने केला व ठरल्या प्रमाणे मध्यरात्री 1000 घोडदळ व 1500 भूदळ सैन्य बाहेर पडले.

बुऱ्हाणपूरच्या रक्षणासाठी मधरस्त्यात एक खंदक खोदला होता, काकरखान ची 500-600 ची पहिली तुकडी पुढे होती, या खंदका मध्ये पूर्वी संकट आले की लाकडे टाकून वेटवून देऊन सरंक्षण केलं जायचे, आता मोघलांच्या कापाळावरून ऐन गारठ्यात घाम फुटला होता, तुकडीच नेतृत्व स्वतः काकरखान करतं होता. खंदकाच्या पलीकडे जंगल होते जिथे मराठ्यांनी तळ ठोकला होता.

काकरखान जरा भीतभितच पण त्याला फौज असल्यामुळे बळ आले होते आशा अवस्थेत तो खंदका जवळ पोचला, त्याला मात्र तिथे कसलीशी कुजबुज जाणवली, तो सैनिकाना सावध होण्याच्या इशारा देणार याच्या अगोदर लपून बसलेले मराठ्यांची घोडी बाहेर पडली व एकच हल्ला कल्लोळ माजला, हर हर महादेव चा नारा गाजला, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय म्हणत मराठे मोगलांवर तुटून पडले. हाना sss मारा sssss म्हणत सपासप वार होऊन धरतीला रक्ताभिषेक होऊ लागला, काकरखानाचे 500-600 सैन्य पुरतेच गारद झाले तसा काकरखानाने पळून जाऊ लागला.

याचवेळी शेजारच्या जंगलात दुसऱ्या मोहिमेसाठी आलेल्या सरसेनापती हंबीर मामांना बऱ्हाणपूरच्या दिशेने हर हर महादेव चा नारा ऐकू आला तसा त्या तुकडीतले सगळे सैन्य हंबीर मामांनी एकत्र केले पण पाहिले त्यांना वाटलं हा शत्रूचा डाव असेल ते आपली दिशाभूल करत असतील पण जंगलातून 10-12 घोडेस्वार हंबीर मामांच्या दिशेने आले व त्यांनी हंबीर मामांना जेंव्हा सांगितले की या मोहिमेवरती स्वतः युवराज छत्रपती आहेत हे कळल्यावर हंबीर मामासंह सगळ्या सैन्याची छाती फुलली , लागलीच सैन्य बुऱ्हाणपूर च्या दिशेने धावत सुटले व आपल्या सैन्याला मिळाले मग मात्र मराठ्यांनी संपूर्ण बऱ्हाणपूर ला वेढा घालून नाकाबंदी केली, व व्यापाऱ्यांनि घरात लपवून ठेवलेले सोने नाणे कुदळी खोऱ्याने व पारेने काढून लुटले. संबंध 3 दिवस लूट चालू होती, याच मोहिमेत शंभूराजांनी जवळच्या बाजारातून सौदागर उस्मान कढुन 2000 अफगाणिस्तान मधले घोडे विकत घेऊन घोडदळ अजून भक्कम केले.
छत्रपती संभाजी महाराजांची राज्याभिषेकानंतरची ही पहिलीच मोहीम होती ती अपेक्षेपेक्षा त्यांना जास्तच यशस्वी वाटली !

एक कोटभर रकमेची दौलत घेऊन सैन्य 4 तुकड्या कडून 4 दिशेने किल्ले साल्हेर च्या दिशेने रवाना झाले, तिकडे मात्र कोकलताश ला निम्म्या रस्त्यात ही बातमी समजली तो मध्यातूनच आपल्या पुतण्याच्या लग्नाला न जाता बुऱ्हाणकडे अंतर काटू राहिला तोपर्यंत मराठे बऱ्हाणपूरातून निसटले होते !

________________________________

🖋 इतिहास वर्णन व शब्दांकन :
      मनोज शिवाजीराव महाडिक
      स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान, सांगली
      संपर्क : ०९८९०३५४३५३
      मेल: manoj.swarajya96@gmail.com
__________________________________

२ टिप्पण्या:

  1. छान लिहीले, मराठ्यांचा इतिहास जाणून घेणार्यांसाठी उपयुक्त ठरेल.

    उत्तर द्याहटवा
  2. ह्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या कुटणीतीचा व दूरदृष्टीचा पूर्णपणे उपयोग झालेला आहे.

    उत्तर द्याहटवा