��आडवाटेचा पहारेकरी - मकरंदगड��
����������������������
सह्याद्रीच्या दरीखोर्यात घडवले गेलेले असे भरपूर गड़किल्ले आहेत जे शोधूनही सापडत नाहीत. निसर्गाचा वारसा लाभलेल्या, भौगोलिक दृष्टया अतिशय दुर्गम भागात निर्माण झालेल्या सह्याद्रीच्या दरी खोर्यातील जावळीचे खोरे हेही तेवढेच भयानक आणि गर्द. सह्याद्रीच्या दरीखोर्यात फ़क्त उन, वारा आणि पाऊस यानाच प्रवास करता येवू शकतो अस म्हणतात, आणि या तिन नैसर्गिक शक्तींपुढे आव्हान घेवून जन्माला येणारा प्रत्येक शिवमावळा या सम्पत्तिचा रखवालदार म्हणून जन्माला येतो(मराठे).
����������������������
आपण याअगोदर माझा सह्याद्रीचा आडवाटेचा पहारेकरी- किल्ले भैरवगड़ हा लेख वाचला असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आडवाटेवरती असे बलाढ्य किल्ले शिवकाळात निर्माण केले गेले ज्यांचे वर्णन करावे तेवढे कमिच पडेल. जावळीच्या खोर्यात असाच एक दुर्गरूपी हिरा किल्ले प्रतापगड व किल्ले वासोटा यांवर लक्ष्य (पहारा) ठेवण्यासाठी तयार केला गेला. इतिहासामधे असे थोडेच किल्ले आहेत की जे इंग्रजांच्या अगोदर कोणत्याच शाहीकडे(मोघलशाही, कुतुबशाही,बादशाही) गेले नाहीत, त्यापैकी किल्ले मकरंदगड हा एक होय.
����������������������
जावळीच्या खोर्यात ट्रेकिंग करायला आम्हास नेहमीच आवडत , किंबहुना त्यास कारणही तसेच आहे. घनदाट वनराई, नीरव शांतता, उंच सुळके आणि बलाढ्य सह्याद्री...| कोनाही ट्रेकर ला भुरळ पडावि असा हिमलयाच्या तोडिस् तोड़ सह्याद्री इथे घडलाय आणि त्याला वरुण इतिहासाची साक्ष.
किल्ले वासोट्याला जायच केले गेलेले प्लानिंग ऐनवेळि बामनोली मधून बोटिंग परवाना नोव्हेंबर पर्यन्त बंद असल्यामुळे न मिळाल्यामुळे चेंज करुण किल्ले मकरंदगड निवडावा लागला.
किल्ले मकरंदगड बद्दल आमचे कोल्हापुर चे दुर्गप्रेमी मित्र शिवशक्ति प्रतिष्ठान च्या दुर्गवेड्याना विचारुण थोडी माहिती घेतली. आम्हास नेहमीच या दुर्गप्रेमींच मार्गदर्शन असत. रविवारी सकाळी लवकर प्रवासाला सुरवात केली, पावसाळी वातावरण होत म्हणून सोबत सर्व सामान ही बॅगेत भरून घोड़े उधाळल आमच. नेहमीप्रमाणे सकाळचा चहा , कांदपोहे खात आम्ही महाबळेश्वर येथे पोचलो. महाबळेश्वर मधे एक कटिंग मारून महाड रोड पकडला. जबरदस्त घाट, पावसामुळे तयार झालेला हिरवागार निसर्ग व सोबत घाटामधे कोसळनारे भव्य धबधबे हा एक नजाराच वेगळा. प्रतापगड च्या अलीकडे 6 Km वर मोठा फलक लावलेला दिसतो "श्रीरामवरदायिनी". त्या प्रवेशदारातून आत रोड सोडून साध्या रोडला जायच. 'हातलोट' गावचा रस्ता विचारत आपण कोकणी जीवन, भातशेति बगत आपण प्रवास करायचा. काल्पनिक स्वर्गापेक्षा हा स्वर्ग अतिसुंदर. रस्त्यावरुन जाताना आडवे येणारे वन्य पशु एक वेगळाच सुखद धक्का मिळतो. अरुंद रस्ते, तुडुंब भरलेले ओढ़े व त्यावरील लाकड़ी पुल हे सर्व प्रथमच पाहायला मिळत.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
"पार" गावच्या फाटयावरुन डाविकडे हातलोट गावकडे जाताना रस्त्यामधेच एक दगडी शिवकालीन पुल पाहायला मिळतो. हा पुल शिवरायांच्या काळात बांधला गेला आहे, पुलाच बांधकाम लजावाब असून आजच्या सिविल इंजीनियरनाही हे चैलेंज आहे एवढं कोरिव, कौशल्यपूर्ण बांधकाम असून आजही भक्कम अवस्थेमधे आहे. 4 भक्कम कमानी या पुलामधे कोरल्या आहेत तर सर्वात महत्वाच् म्हणजे या पुलाचे बांधकाम माश्याच्या आकाराप्रमाने (म्हणजेच प्रवाहाच्या दिशेला धार कापनारे निमूळते-Aerodynamic shape)आहे. म्हणजेच त्याकाळिहि किती प्रगत स्थापत्य कला अवगत होती याची प्रचिती येते. या पुलाच्या बाजुलाच पुलाच्या बांधकाम वेळचे गणेश मंदिर आहे. येथून पुढे 7-8km वर गेल्यावर आपन हातलोट गावात पोचतो.
����������������������
गावात प्रवेश केल्यानंतर गाडया शाळेजवळ लावून पायी चालते व्हावे. गावातून पश्चिमेकडे बलाढ्य असा मकरंदगड व त्याच्या बाजुलाच उंच असा मधुगड़ दिसतो. इथुन किल्ल्यावर जाणारा रस्ता हा जंगलातून असल्यामुळे चढ़ाई असली तरी सुखद प्रवास होतो. मळलेल्या वाटेने आम्ही चढ़ाईचा पहिला टप्पा पार करत होतो. अधुन मधुन एखादा वन्यप्राणी दर्शन देत होता.(अस्वल व राणगवे इथे आढळतात असे गावकरी म्हणतात म्हणून योग्य ती काळजी घ्यावी). जास्त घनदाट जंगल असल्यामुळे इथे रक्तशोशु जळूनचा खुप त्रास होतो.
जंगलातुन आपण प्रवास केल्यावर आपण पहिल्या टप्प्यावर येवून पोचतो. इथुन किल्ल्याचा बालेकिल्ला दिसतो. जवळच घोनसपुर चे शिवमंदिर आहे, इथे थोडावेळ विश्रांति करुण उजविकडे जाणाऱ्या रस्त्याने जावे. डावा रस्ता घोनसपुर गावात जातो. इथुन
खड़ी चढाई केल्यावर आपण पड़झड़ झालेल्या दरवाजा पाशी पोचतो. दरवाजा पूर्णतः पडलेला आहे. इथुन पुढे गेल्यावर आपण मल्लिकार्जुन मंदिरापशि पोचतो. हे पुरातन मंदिर शंकराचे आहे.मंदिरासमोर नंदी असून मंदिरामधे काळ्या पाषाणातिल शंकराची सुबक मूर्ति आहे. मंदिरासमोर वृंदावन आहे. या जागेपासून किल्ले मधुगड आपल्याला आकर्षित करतो पण गडाकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत. मंदिराच्या पाठीमागिल बाजूस उजव्या कड्याच्या खालील बाजूस एक 150 फुट उतरले असता आपल्याला सुंदर असे पाण्याचे टाके दिसते.(उतरताना माती मुरमाड असल्यामुळे सावकाश उतरावे,अन्यथा 1500 फुट खोल दरित पडून प्राण गमवावा लागेल) हे टाके कातळात खोदलेल असून यातील पानी स्वच्छ व मधुर आहे. टाक्याच्या वरील बाजूस हनुमानाचे शिल्प कोरलेले दिसते ते नीट निरखून पाहावे. टाक्याची आतील खोली किती आहे हे अजुन समजलेले नाहिये. गडावर रक्ती टाके व इतर 5 टाके कोरडी आहेत तर फकत पांडव टाके पाण्याने भरलेले असते.
गडावर याव्यतिरिक्त पहावहायस काही नाही.
����������������������
��जायचे कसे-
महाबलेश्वर - महाड़ महामार्गावर प्रतापगड च्या अलीकडे 5km वर हातलोट ला जायला फाटा आहे.
����������������������
��संकलन आणि लेखन-
स्वराज्य योद्धा ट्रेकर्स
शिवछावा. मनोज शिवाजीराव महाडिक
शिवशक्ति चौक, नेवरी
ता. कडेगाव
जि.सांगली 415311
मो- 9890354353/9156571313
मेल- manoj.swarajya96@gmail.com
©सर्व माहिती व फोटो सरंक्षित