स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

आडवाटेचा पहारेकरी- मकरंदगड

��आडवाटेचा पहारेकरी - मकरंदगड��

����������������������

सह्याद्रीच्या दरीखोर्यात घडवले गेलेले असे भरपूर गड़किल्ले आहेत जे शोधूनही सापडत नाहीत. निसर्गाचा वारसा लाभलेल्या, भौगोलिक दृष्टया अतिशय दुर्गम भागात निर्माण झालेल्या सह्याद्रीच्या दरी खोर्यातील जावळीचे खोरे हेही तेवढेच भयानक आणि गर्द. सह्याद्रीच्या दरीखोर्यात फ़क्त उन, वारा आणि पाऊस यानाच प्रवास करता येवू शकतो अस म्हणतात, आणि या तिन नैसर्गिक शक्तींपुढे आव्हान घेवून जन्माला येणारा प्रत्येक शिवमावळा या सम्पत्तिचा रखवालदार म्हणून जन्माला येतो(मराठे).

����������������������

आपण याअगोदर माझा सह्याद्रीचा आडवाटेचा पहारेकरी- किल्ले भैरवगड़ हा लेख वाचला असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आडवाटेवरती असे बलाढ्य किल्ले शिवकाळात निर्माण केले गेले ज्यांचे वर्णन करावे तेवढे कमिच पडेल. जावळीच्या खोर्यात असाच एक दुर्गरूपी हिरा किल्ले प्रतापगड व किल्ले वासोटा यांवर लक्ष्य (पहारा) ठेवण्यासाठी तयार केला गेला. इतिहासामधे असे थोडेच किल्ले आहेत की जे इंग्रजांच्या अगोदर कोणत्याच शाहीकडे(मोघलशाही, कुतुबशाही,बादशाही) गेले नाहीत, त्यापैकी किल्ले मकरंदगड हा एक होय.

����������������������

जावळीच्या खोर्यात ट्रेकिंग करायला आम्हास नेहमीच आवडत , किंबहुना त्यास कारणही तसेच आहे. घनदाट वनराई, नीरव शांतता, उंच सुळके आणि बलाढ्य सह्याद्री...| कोनाही ट्रेकर ला भुरळ पडावि असा हिमलयाच्या तोडिस् तोड़ सह्याद्री इथे घडलाय आणि त्याला वरुण इतिहासाची साक्ष.
किल्ले वासोट्याला जायच केले गेलेले प्लानिंग ऐनवेळि बामनोली मधून बोटिंग परवाना नोव्हेंबर पर्यन्त बंद असल्यामुळे न मिळाल्यामुळे चेंज करुण किल्ले मकरंदगड निवडावा लागला.
किल्ले मकरंदगड बद्दल आमचे कोल्हापुर चे दुर्गप्रेमी मित्र शिवशक्ति प्रतिष्ठान च्या दुर्गवेड्याना विचारुण थोडी माहिती घेतली. आम्हास नेहमीच या दुर्गप्रेमींच मार्गदर्शन असत. रविवारी सकाळी लवकर प्रवासाला सुरवात केली, पावसाळी वातावरण होत म्हणून सोबत सर्व सामान ही बॅगेत भरून घोड़े उधाळल आमच. नेहमीप्रमाणे सकाळचा चहा , कांदपोहे खात आम्ही महाबळेश्वर येथे पोचलो. महाबळेश्वर मधे एक कटिंग मारून महाड रोड पकडला. जबरदस्त घाट, पावसामुळे तयार झालेला हिरवागार निसर्ग व सोबत घाटामधे कोसळनारे भव्य धबधबे हा एक नजाराच वेगळा. प्रतापगड च्या अलीकडे 6 Km वर मोठा फलक लावलेला दिसतो "श्रीरामवरदायिनी". त्या प्रवेशदारातून आत रोड सोडून साध्या रोडला जायच. 'हातलोट' गावचा रस्ता विचारत आपण कोकणी जीवन, भातशेति बगत आपण प्रवास करायचा. काल्पनिक स्वर्गापेक्षा हा स्वर्ग अतिसुंदर. रस्त्यावरुन जाताना आडवे येणारे वन्य पशु एक वेगळाच सुखद धक्का मिळतो. अरुंद रस्ते, तुडुंब भरलेले ओढ़े व त्यावरील लाकड़ी पुल हे सर्व प्रथमच पाहायला मिळत.

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

"पार" गावच्या फाटयावरुन डाविकडे हातलोट गावकडे जाताना रस्त्यामधेच एक दगडी शिवकालीन पुल पाहायला मिळतो. हा पुल शिवरायांच्या काळात बांधला गेला आहे, पुलाच बांधकाम लजावाब असून आजच्या सिविल इंजीनियरनाही हे चैलेंज आहे एवढं कोरिव, कौशल्यपूर्ण बांधकाम असून आजही भक्कम अवस्थेमधे आहे. 4  भक्कम कमानी या पुलामधे कोरल्या आहेत तर सर्वात महत्वाच् म्हणजे या पुलाचे बांधकाम माश्याच्या आकाराप्रमाने (म्हणजेच प्रवाहाच्या दिशेला धार कापनारे निमूळते-Aerodynamic shape)आहे. म्हणजेच त्याकाळिहि किती प्रगत स्थापत्य कला अवगत होती याची प्रचिती येते. या पुलाच्या बाजुलाच पुलाच्या बांधकाम वेळचे गणेश मंदिर आहे. येथून पुढे 7-8km वर गेल्यावर आपन हातलोट गावात पोचतो.
����������������������

गावात प्रवेश केल्यानंतर गाडया शाळेजवळ लावून पायी चालते व्हावे. गावातून पश्चिमेकडे बलाढ्य असा मकरंदगड व त्याच्या बाजुलाच उंच असा मधुगड़ दिसतो. इथुन किल्ल्यावर जाणारा रस्ता हा जंगलातून असल्यामुळे चढ़ाई असली तरी सुखद प्रवास होतो. मळलेल्या वाटेने आम्ही चढ़ाईचा पहिला टप्पा पार करत होतो. अधुन मधुन एखादा वन्यप्राणी दर्शन देत होता.(अस्वल व राणगवे इथे आढळतात असे गावकरी म्हणतात म्हणून योग्य ती काळजी घ्यावी). जास्त घनदाट जंगल असल्यामुळे इथे रक्तशोशु जळूनचा खुप त्रास होतो.
जंगलातुन आपण प्रवास केल्यावर आपण पहिल्या टप्प्यावर येवून पोचतो. इथुन किल्ल्याचा बालेकिल्ला दिसतो. जवळच घोनसपुर चे शिवमंदिर आहे, इथे थोडावेळ विश्रांति करुण उजविकडे जाणाऱ्या रस्त्याने जावे. डावा रस्ता घोनसपुर गावात जातो. इथुन
खड़ी चढाई केल्यावर आपण पड़झड़ झालेल्या दरवाजा पाशी पोचतो. दरवाजा पूर्णतः पडलेला आहे. इथुन पुढे गेल्यावर आपण मल्लिकार्जुन मंदिरापशि पोचतो. हे पुरातन मंदिर शंकराचे आहे.मंदिरासमोर नंदी असून मंदिरामधे काळ्या पाषाणातिल शंकराची सुबक मूर्ति आहे. मंदिरासमोर वृंदावन आहे. या जागेपासून किल्ले मधुगड आपल्याला आकर्षित करतो पण गडाकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत. मंदिराच्या पाठीमागिल बाजूस उजव्या कड्याच्या खालील बाजूस एक 150 फुट उतरले असता आपल्याला सुंदर असे पाण्याचे टाके दिसते.(उतरताना माती मुरमाड असल्यामुळे सावकाश उतरावे,अन्यथा 1500 फुट खोल दरित पडून प्राण गमवावा लागेल) हे टाके कातळात खोदलेल असून यातील पानी स्वच्छ व मधुर आहे. टाक्याच्या वरील बाजूस हनुमानाचे शिल्प कोरलेले दिसते ते नीट निरखून पाहावे. टाक्याची आतील खोली किती आहे हे अजुन समजलेले नाहिये. गडावर रक्ती टाके व इतर 5 टाके कोरडी आहेत तर फकत पांडव टाके पाण्याने भरलेले असते.
गडावर याव्यतिरिक्त पहावहायस काही नाही.
����������������������

��जायचे कसे-
महाबलेश्वर - महाड़ महामार्गावर प्रतापगड च्या अलीकडे 5km वर हातलोट ला जायला फाटा आहे.
����������������������

��संकलन आणि लेखन-

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स
शिवछावा. मनोज शिवाजीराव महाडिक
शिवशक्ति चौक, नेवरी
ता. कडेगाव
जि.सांगली 415311
मो- 9890354353/9156571313
मेल- manoj.swarajya96@gmail.com

©सर्व माहिती व फोटो सरंक्षित

सोमवार, १८ मे, २०१५

सह्याद्रिचा दनकट कणा - किल्ले लोहगड

�� सह्याद्रिचा बुलंद कणा- किल्ले लोहगड ��

            (ता. मावळ जि. पुणे) 

---------------------------

आजच्या घडीला भक्कम किल्ला , किल्ले प्राचीनता व अजोड आणि भक्कम असे बांधकाम फारच कमी किल्ल्यावर पहायला मिळते. त्यापैकी मी एक ऐकलेल नाव म्हणजे किल्ले लोहगड.....
लोहगड किल्ल्याबद्दल भरपुर वाचल होत व फोटोही पाहिले होते पण जी मजा किंवा इतिहासाचा थरार स्वता आपण तिथे जावून पाहन्यात , अनुभवन्यात असते तेवढी ती वाचण्यात नसते तरीही आपल्या काही बिझी इतिहास वेड्यांसाठी हा सारा शब्द प्रपंच....

लोनावळा घाटाचा संरक्षक किल्ला म्हणून किल्ले लोहगड व किल्ले विसापूर या जवळ असणार्या दुर्ग जोडीकडे पाहिले जाते. मुंबई- पुणे महामार्गावर मळवलि गावातून डाव्या बाजूला ही दुर्ग जोड़ी दिसते त्यामुळे किल्ल्यापर्यंत पोहचायला जास्त त्रास होत नाही.

��������������������

आमच्या विटयाच्या बळवंत महाविद्यालयातिल  B.C.A च्या दुर्ग प्रेमी मित्रांची नुकतीच एक्झाम संपली होती म्हणून आम्ही भरपूर दिवस पेंडिंग असलेल्या किल्ले लोहगड ला 3 मे ला जायचा प्लान केला......

नेहमिप्रमाने सर्व साहित्य घेवुन आम्ही मेगा हायवे ने मळवलि गावापर्यंत येवून पोचलो तेथून महामार्ग सोडून कच्च्या रस्त्याने आम्ही किल्ले लोहगड च्या पायथ्याशी असलेल्या लोहगडवाडी येथे पोचलो. गाडीतून उतरताच समोर किल्ले लोहगड चे अक्राळ विक्राळ रूप दिसायला लागले. तासिव कड़े, नागमोडी दरवाजांची बांधनी, भक्कम बुरुज, किल्ल्याभोवातिचे जंगल व सगळ्यात प्रेक्षणीय असे विंचूकाटामाची खालुनच पाहून गाडीतला थकवा दूर झाला.

����������������������

गाड़ी पार्क करुण आम्ही स्वागत बोर्डाजवळ येवून किल्ल्याचा इतिहास व माहिती वाचली. येथून पायर्यांच्या वाटेने ( पायर्या आता घडवील्या आहेत) चालु लागलो. या किल्ल्यावरचे चालू असलेले काम पाहुन प्रशासनाचे आभार मानु वाटते. थोड्या कच्च्या रस्त्याने गेल्यावर आपण प्रथम गणेश दरवाजा पशी येवून पोहोचलो, या दरवाजावर गणपतीची मूर्ति कोरलेली आहे, या दरवाजाच्या दोन्ही बुरजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळि देण्यात आल्यामुले लोहगडवाडी ही त्यांच्या वंशजाना पाटिलकी देण्यात आली. या दरवाजातून पुढे गेल्यावर आपण गडाच्या दूसरा दरवाजा म्हणजे हनुमान दरवाजा पशी येवून पोचतो . हा गडाचा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. या दरवाजावर शरभाची प्रतिकृति कोरली आहे. याच्या बाजुलाच 2 धान्याची कोठारे आहेत. व समोरच एक शिलालेख दगडात कोरलेला आहे, त्याच्या बाजुलाच 3 तोफा आहेत. इथे थाम्बुन दरवाजांचा सर्पाकार मार्ग पहावा. येथुन पुढे नारायण दरवाजात यावे. याच्या बाजुलाच तटा मधे एक पाण्याचे टाके व एक गुहा कोरली आहे. येथील सगळ्या दरावाजांची स्तिथि मजबूत आहे. येथून पुढे लागतो तो महादारवाजा, महादरवाजाचे दरवाजे व साखळ्या आजही चांगल्या अवस्थेत आहेत.

��������������������

महादरवाजातुन आत गेल्यावर डाव्या बाजूला धड़गे असलेली मशीद असून त्याच्या समोर काही दगडी शिल्पे आहेत त्याच्या समोरच एक तोफ आहे व डाव्या बाजूला सदर आहे. मशिदी समोर चुन्याचा घान्याची टाकी आहे. सदरे समोर पडलेले किल्लेदारांच्या वाड्याचे  अवशेष आहेत. याच्या डाव्या बाजूने पुढे चालत गेल्यावर त्रिम्बकेश्वर महादेवाचे मंदिर आहे याच्या मागे पाण्याची भरपूर टाके आहेत. पुढे विंचू काट्याकड़े चालत गेल्यावर मधेच आपल्याला नाना फडनविसानि बांधलेले अस्टकोनि छोटा तलाव आहे. येथून पुढे तेकडीपशी एक थाडगे आहे व त्याचा बाजुलाच भव्य असा 16 कोनी तलाव लागतो, दोन्ही तलावामधे सध्या पानी आहे. पुढे गडाच्या पदझड झालेल्या बुरजाजवळ जावे येथे आल्यावर आपल्याला किल्ले राजगडावरिल संजीवनी माचिची आठवण होते कारण हीच ती गडावरील बलाढ्य विन्चवाच्या नान्गीसारखी दिसणारी विंचूकाटामाची. ही माची गडाच्या उन्चिपेक्षा थोड़ी छोटी आहे परन्तु बुलंद अशी आहे, दोन्ही बाजूला भक्कम तटबंदी आहे व मुख्यत्वे म्हणजे माचिवर एक पाण्याचे टाकेही आहे. ही माचि 1500 मीटर लांब व 30 मीटर रुंद आहे. या माचिचा ऊपयोग टेहळनी साठी केला जायचा.

माची बगुन परत आल्या वाटेने माघारी यायचे परन्तु गडाच्या पूर्व बाजूने जावे. जाताना आपल्याला लक्ष्मी कोठी लागेल जिचा वापर संपति लपवुन ठेवन्यासाठी केला होता. कोठीच्या बाहेर एक टाके आहे व या टाक्यात भगवे मासे आहेत. याच्या समोरच एक तोफ आहे तिहि आवर्जुन पहावी.

����������������������

�� इतिहास :

लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इ.स १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगड हा एक महत्वाचा किल्ला होता. इ.स १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हासर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्यासुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगर्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तोआपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा, शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्यापत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसर्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला.ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

��������������������

�� जय जिजाऊ
�� जय शिवराय
�� जय रौद्र शंभो

��माहिती संकलन आणि लेखन-

��स्वराज्य योद्धा ट्रेकर्स��

शिवछावा- मनोज शिवाजी महाडिक
"स्वराज्य" शिवशक्ति चौक , नेवरी.
ता. कडेगाव जि. सांगली 415311
मो. 9890354353 / 7507627003
मेल- manoj.swarajya96@gmail.com

©सर्व माहिती व फोटो संरक्षित

सोमवार, १६ मार्च, २०१५

किल्ले चंद्रगड

�� जावळिचा वाघ - किल्ले ढवळ्यागड.....
        (सह्याद्रितिल एक ट्रेकिंग थरार)

����������������������

परवा इतिहासाची पुस्तके चाळत बसलो होतो त्यात जावळिचा इतिहास हाती लागला. इतिहास वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जावळिच्या चंद्रराव मोरेने छत्रपती शिवरायांना धमकी वजा पत्र लिहिले होते व त्यात त्याने शिवरायांना सरळ सरळ धमकावले होते की , तुम्ही जावळि खोर्यात येवून तर बघा तुमची काय हालत करतो ते??? शेवटी छ. शिवरायांनी चंद्रगड किल्ला जिंकला हा भाग वेगळा पण मनात एक उत्कंठा , अनेक प्रश्न निर्माण झाले की, राव या मोरेने एवढे धाडस त्यावेळी कसे काय केले?? किंवा कोणाच्या जिवावर केले?? या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी आम्ही किल्ले चंद्रगड (उर्फ़ ढवळ्यागड) दुर्ग भ्रमंती करायचे ठरवले...... आणी भ्रमंती करून आल्यावर आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.

����������������������

काल रविवार.... ऑफिस ला सुट्टी होती मग आमचा दुर्ग भ्रमंतिचा प्लान सुरु झाला. तसे पाहता जावळिच्या खोर्यातिल हा माझा पहिलाच ट्रेक होता त्यामुळे उत्कंठा पण शिगेला पोहोचलेली...
आमचे मित्र सदाशिवगड संवर्धन समितीचे अध्यक्ष शिवश्री. रोहित माने, आमचे हितचिंतक शिवश्री. नितिन लोखंडे व आमचे तासगाव चे नविन दुर्गप्रेमी मित्र शिवश्री. सागर पाटिल यांना फोनवरून कल्पना देवून आम्ही रविवारी सकाळी लवकर जायच ठरवल...

����������������������

रविवार उजाडला पाहटेपासुन आमची जायची तयारी सुरु झाली. 5 वाजता बैग भरुन आम्ही प्रस्थान केले. कराड मधे सगळे एकत्र जमलो व निघालो... पहाटेची थंडी अनुभवत आम्ही महाबळेश्वर मधे पोचलो. इथे मात्र थंडी मुळे खुप हाल झाले परंतु जसे पोलादपुर मार्गे जायला आम्ही घाट उतरायला लागलो तस तसे थंडी कमी जाणवायला लागली. चोहोबाजुनी सह्याद्रिचे कातळ कड़े, हिरवागार निसर्ग , व त्या डोंगराआडून दिसणारी किल्ले प्रतापगड ची माची बघून मन भरुन आले.....
अखेर आम्ही घाट उतारून कापडे फ़ाट्यावर पोहोचलो. तेथे पाण्याच्या बोटल्स घेवुन आम्ही उमरठ गावचा रस्ता विचारत निघालो. उमरठ गाव म्हणजे स्वराज्याचे सेनापती नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मस्थान आहे. ज्या आपल्या बापजादयानि गडातटावरुन इतिहास घडवला , "आदि लगिन कोंढान्याच मग माज्या रायबाच" म्हणत ज्यांनी स्वराज्य निष्ठा दाखवली त्या नरविराच हे गाव. गावात आल्यावर प्रथम समाधी पशी गेलो . येथे तानाजी मालुसरे व शेलार मामा या दोन विरांच्या समाधी आहेत. समाधिपशी नतमस्तक झालो व वीर मशालीच दीप प्रजलन करून पुढे ढवळे गावचा रस्ता विचारत निघालो. जाताना मालुसरेंच्या स्मारकाबाहेर किराना दुकानामधे श्री. पोकळे नावाच्या सद्ग्रहस्थाकडे 1965 साली आम्ब्याच्या झाडाच्या ढोली मधे त्याना 2 तलवारी सापडल्या आहेत त्या आवर्जुन पहाव्यात. त्यापैकी एक मराठा तलवार तर एक दांडपट्टा आहे. तलवारी हातात घेतल्यावर एक वेगलाच अनुभव आला. याच शस्त्राने मावळ्यानि शत्रुचा बीमोड केला होता.

येथून पुढे 5KM वर ढ्वळे गाव आहे. गावातील शाळेत गाड्या लावून आम्ही मंदिराच्या पाठीमागून किल्ल्याला जायला वाट आहे त्यामार्गे निघालो. वाटाड्या घ्यायचाच नाही अशी सगळ्यांचा ठराव झाल्यावर आम्ही गावातील गावकर्यांना माहिती विचारून पायी प्रवास चालु केला. येथून एका डोंगराच्या आडोशाला किल्ले ढवल्यागड असल्यामुळे प्रथम कोळिवस्ती विचारत तेथेपर्यन्त पोहोचलो. कोळी वस्तिपासुन किल्ला दिसायला लागला. किल्ल्याकडे तोंड करून चालायला लागलो, जाताना ओढा लागेल त्या ओढ्यातुन अर्धा तासाची चढ़ाई केल्यावर आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. इथेपर्यन्त येइपर्यन्त अंगातला सगळा त्राण गेला होता. याऊलट खरी चढ़ाई आता सुरु झाली होती. कारण एकतर आम्ही रस्ता चुकलो होतो आणि आमच्या समोर आता फकत काळा कातळ कडा होता. रॉक क्लाइम्बिंग करायच होत पण आमच्याकडे वायर रोप नव्हता. शेवटी रिस्क घेवुन आम्ही वर जायचच ठरवल. खरपाहता हा आमचा निर्णय चुकीचा होता कारण सेफ्टी सामानाशिवाय ट्रेक करणे हे कधीही धोक्याच. थोडा जरी पाय टाकायला चुकला तर मरनार हे निश्चित होत पण दुर्ग प्रेमाने आम्हाला एवढ वेड लावलय की त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार झालो असतो. शेवटी निर्णय झाला व आम्ही ट्रैकिंग ला सुरवात केलि. "सह्याद्री" ही 3 अक्षरे नुसती वाचायला बरी वाटतात पण ते अनुभवल्यावर त्याच खर अक्राळ विक्राळ रूप समजते. काळ्या कातळातले तासिव कड़े , भेभान वारा, व आपल्यासमोर एकच उद्धिस्ट ते म्हणजे कहिहि करून गडावर जायचेच. पुस्तकातल्या निम्म्या प्रश्नांच उत्तर मला मिळाल होत, ते म्हणजे या गडावर सैन्य जरी कमी असल तरीही गडाच्या नैर्सगिक भिषण रुपामुळे गडावर आक्रमण करायलाच कोण धजावनार नाही. निम्म्यात गेल्यावर पाय थरथर कापायला लागले, खाली पाहिले की डोळे फिरायचे 700-800 मीटर खोली, पकडायला जागा कमी, पाय रोवायला खाची पण कमी एवढा तासिव कडा, मध्यात गेल्यामुळे धड उतरुही शकत नव्हतो, पुन्ग्या टाइट झाल्या पण पुन्हा दगडाला ठेपा देत व गवताला पकडून अखेर वर पोहोचलोच. गडावर पोहोचताच मनाची मरगळ आसपासच दृश्य बगुण गायबच झाली एवढ तूफान सह्याद्रीच सौन्दर्य किल्ले ढवळ्यागडावर आपल्याला पहायला मिळते.
ज्या सौंन्दर्या च वर्णन शब्दात कमी पडेल असा निसर्ग खजाना आपल्याला डोळे फाडून बगितल्याशिवाय कोणीही राहणार नाही. येथून गडाच्या उत्तरेकडे चालत जाताना सुरवातीला ढवळ्या महादेवाच शिवलिंग व नंदी दगडात कोरलेला दिसतो. येथे मंदिर कुठेही नाही कारण गडावर वार्याचा वेग असल्यामुळे येथे काहीही टिकू शकत नाही. शिवलिंगापासून पुढे गेल्यावर तटबंदिच्या खाली 5 पाण्याची टाके आहेत, पण येथे पोहोचता येत नाही. येथून पुढे सरळ गेल्यावर आम्ही बालेकिल्ल्यावर गेलो. जाताना रस्त्यामधे एक पाण्याचे टाके लागले पण यामधल पानी पिन्यायोग्य नाही. त्याच्या थोडच पुढे राजवाड्याचे पडलेले अवशेष होते त्याच्या बाजुलाच देवी जननी कमळजा चा चौथरा आहे व दुसरे एक शिवलिंग आहे. शिवलींगासमोर एक दगडी गोळा पडलेला होता.

आणखी उत्तरेकडे चालत गेल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी  व ख़ाली उतरायला पायर्या दिसल्या. तेथून खाली गेल्यावर एक अप्रतिम अस पाण्याच टाक गडाच्या एकदम काठावर कोरलेल आहे ते पाहून त्यामधिल पानी पिलो. पाणी थंड व चवदार होते, तहानच भागली पाण्याने. या टाक्याच समोरच कातळामधे पहरेकर्यानसाठी कोरलेली गुहाही आजही चांगल्या अवस्थेत आहे. हा शेवटचा टप्पा आहे. येथून पायर्यापर्यंत गेल्यावर त्याच्या डाव्या बाजूला 3 टाके आहेत तेही जरुर पहावे......

����������������������

�� इतिहास -

कांगोरी गड चंद्रराव मोर्यांनी जावळीच्या खोर्यात बांधला. त्याचा उपयोग घाटमार्गाच्या संरक्षणासाठी व टेहाळणीसाठी केला गेला. १५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर कांगोरी गड, ढवळगड, रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजी सारखा कसलेला योध्दा मिळाला. चंद्रगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून ‘‘गहनगड’’ ठेवले. संभाजी महाराजांचा वध केल्यावर औरंगजेबाने इतकादरखान उर्फ जुल्फीकारखानास रायगड घेण्यास सांगितले. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च १६८९ मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला. त्यावेळी मंगळगड मोघलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी ‘मंगळगड’जिंकून घेतला. इ.स १८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर वमॉरीसन या इंग्रज अधिकार्यांना अटक करुन मंगळगडावर तुरुंगवासात ठेवले होते. इ.स १८१८ मध्ये कनेल पॉथर या इंग्रजाने हा किल्ला जिंकला.

����������������������

��कसे जाल-

महाबलेश्वर मधून पोलादपुर रोडला 43 km वर कापड़े फाटा लागतो तेथून उजव्या बाजूने आत वळुन उमरठ गावचा रोड विचारावा. उमरठ पासून 7 km वर ढवळे हे गडाच्या पायथ्याच गाव आहे.

����������������������

�� जय जीजाऊ
�� जय शिवराय
�� जय रौद्र शंभो

��माहिती संकलन आणि लेखन-

��स्वराज्य योद्धा ट्रेकर्स��

शिवछावा- मनोज शिवाजी महाडिक
"स्वराज्य" शिवशक्ति चौक , नेवरी.
ता. कडेगाव जि. सांगली 415311
मो. 9156571313 / 9890354353
मेल- manoj.swarajya96@gmail.com

©सर्व माहिती व फोटो संरक्षित