सह्याद्रिचा बुलंद कणा- किल्ले लोहगड
(ता. मावळ जि. पुणे)
---------------------------
आजच्या घडीला भक्कम किल्ला , किल्ले प्राचीनता व अजोड आणि भक्कम असे बांधकाम फारच कमी किल्ल्यावर पहायला मिळते. त्यापैकी मी एक ऐकलेल नाव म्हणजे किल्ले लोहगड.....
लोहगड किल्ल्याबद्दल भरपुर वाचल होत व फोटोही पाहिले होते पण जी मजा किंवा इतिहासाचा थरार स्वता आपण तिथे जावून पाहन्यात , अनुभवन्यात असते तेवढी ती वाचण्यात नसते तरीही आपल्या काही बिझी इतिहास वेड्यांसाठी हा सारा शब्द प्रपंच....
लोनावळा घाटाचा संरक्षक किल्ला म्हणून किल्ले लोहगड व किल्ले विसापूर या जवळ असणार्या दुर्ग जोडीकडे पाहिले जाते. मुंबई- पुणे महामार्गावर मळवलि गावातून डाव्या बाजूला ही दुर्ग जोड़ी दिसते त्यामुळे किल्ल्यापर्यंत पोहचायला जास्त त्रास होत नाही.
आमच्या विटयाच्या बळवंत महाविद्यालयातिल B.C.A च्या दुर्ग प्रेमी मित्रांची नुकतीच एक्झाम संपली होती म्हणून आम्ही भरपूर दिवस पेंडिंग असलेल्या किल्ले लोहगड ला 3 मे ला जायचा प्लान केला......
नेहमिप्रमाने सर्व साहित्य घेवुन आम्ही मेगा हायवे ने मळवलि गावापर्यंत येवून पोचलो तेथून महामार्ग सोडून कच्च्या रस्त्याने आम्ही किल्ले लोहगड च्या पायथ्याशी असलेल्या लोहगडवाडी येथे पोचलो. गाडीतून उतरताच समोर किल्ले लोहगड चे अक्राळ विक्राळ रूप दिसायला लागले. तासिव कड़े, नागमोडी दरवाजांची बांधनी, भक्कम बुरुज, किल्ल्याभोवातिचे जंगल व सगळ्यात प्रेक्षणीय असे विंचूकाटामाची खालुनच पाहून गाडीतला थकवा दूर झाला.
गाड़ी पार्क करुण आम्ही स्वागत बोर्डाजवळ येवून किल्ल्याचा इतिहास व माहिती वाचली. येथून पायर्यांच्या वाटेने ( पायर्या आता घडवील्या आहेत) चालु लागलो. या किल्ल्यावरचे चालू असलेले काम पाहुन प्रशासनाचे आभार मानु वाटते. थोड्या कच्च्या रस्त्याने गेल्यावर आपण प्रथम गणेश दरवाजा पशी येवून पोहोचलो, या दरवाजावर गणपतीची मूर्ति कोरलेली आहे, या दरवाजाच्या दोन्ही बुरजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळि देण्यात आल्यामुले लोहगडवाडी ही त्यांच्या वंशजाना पाटिलकी देण्यात आली. या दरवाजातून पुढे गेल्यावर आपण गडाच्या दूसरा दरवाजा म्हणजे हनुमान दरवाजा पशी येवून पोचतो . हा गडाचा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. या दरवाजावर शरभाची प्रतिकृति कोरली आहे. याच्या बाजुलाच 2 धान्याची कोठारे आहेत. व समोरच एक शिलालेख दगडात कोरलेला आहे, त्याच्या बाजुलाच 3 तोफा आहेत. इथे थाम्बुन दरवाजांचा सर्पाकार मार्ग पहावा. येथुन पुढे नारायण दरवाजात यावे. याच्या बाजुलाच तटा मधे एक पाण्याचे टाके व एक गुहा कोरली आहे. येथील सगळ्या दरावाजांची स्तिथि मजबूत आहे. येथून पुढे लागतो तो महादारवाजा, महादरवाजाचे दरवाजे व साखळ्या आजही चांगल्या अवस्थेत आहेत.
महादरवाजातुन आत गेल्यावर डाव्या बाजूला धड़गे असलेली मशीद असून त्याच्या समोर काही दगडी शिल्पे आहेत त्याच्या समोरच एक तोफ आहे व डाव्या बाजूला सदर आहे. मशिदी समोर चुन्याचा घान्याची टाकी आहे. सदरे समोर पडलेले किल्लेदारांच्या वाड्याचे अवशेष आहेत. याच्या डाव्या बाजूने पुढे चालत गेल्यावर त्रिम्बकेश्वर महादेवाचे मंदिर आहे याच्या मागे पाण्याची भरपूर टाके आहेत. पुढे विंचू काट्याकड़े चालत गेल्यावर मधेच आपल्याला नाना फडनविसानि बांधलेले अस्टकोनि छोटा तलाव आहे. येथून पुढे तेकडीपशी एक थाडगे आहे व त्याचा बाजुलाच भव्य असा 16 कोनी तलाव लागतो, दोन्ही तलावामधे सध्या पानी आहे. पुढे गडाच्या पदझड झालेल्या बुरजाजवळ जावे येथे आल्यावर आपल्याला किल्ले राजगडावरिल संजीवनी माचिची आठवण होते कारण हीच ती गडावरील बलाढ्य विन्चवाच्या नान्गीसारखी दिसणारी विंचूकाटामाची. ही माची गडाच्या उन्चिपेक्षा थोड़ी छोटी आहे परन्तु बुलंद अशी आहे, दोन्ही बाजूला भक्कम तटबंदी आहे व मुख्यत्वे म्हणजे माचिवर एक पाण्याचे टाकेही आहे. ही माचि 1500 मीटर लांब व 30 मीटर रुंद आहे. या माचिचा ऊपयोग टेहळनी साठी केला जायचा.
माची बगुन परत आल्या वाटेने माघारी यायचे परन्तु गडाच्या पूर्व बाजूने जावे. जाताना आपल्याला लक्ष्मी कोठी लागेल जिचा वापर संपति लपवुन ठेवन्यासाठी केला होता. कोठीच्या बाहेर एक टाके आहे व या टाक्यात भगवे मासे आहेत. याच्या समोरच एक तोफ आहे तिहि आवर्जुन पहावी.
इतिहास :
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इ.स १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगड हा एक महत्वाचा किल्ला होता. इ.स १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हासर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्यासुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगर्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तोआपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा, शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्यापत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसर्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला.ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय रौद्र शंभो
माहिती संकलन आणि लेखन-
स्वराज्य योद्धा ट्रेकर्स
शिवछावा- मनोज शिवाजी महाडिक
"स्वराज्य" शिवशक्ति चौक , नेवरी.
ता. कडेगाव जि. सांगली 415311
मो. 9890354353 / 7507627003
मेल- manoj.swarajya96@gmail.com
©सर्व माहिती व फोटो संरक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा