स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

सोमवार, १६ मार्च, २०१५

किल्ले चंद्रगड

�� जावळिचा वाघ - किल्ले ढवळ्यागड.....
        (सह्याद्रितिल एक ट्रेकिंग थरार)

����������������������

परवा इतिहासाची पुस्तके चाळत बसलो होतो त्यात जावळिचा इतिहास हाती लागला. इतिहास वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जावळिच्या चंद्रराव मोरेने छत्रपती शिवरायांना धमकी वजा पत्र लिहिले होते व त्यात त्याने शिवरायांना सरळ सरळ धमकावले होते की , तुम्ही जावळि खोर्यात येवून तर बघा तुमची काय हालत करतो ते??? शेवटी छ. शिवरायांनी चंद्रगड किल्ला जिंकला हा भाग वेगळा पण मनात एक उत्कंठा , अनेक प्रश्न निर्माण झाले की, राव या मोरेने एवढे धाडस त्यावेळी कसे काय केले?? किंवा कोणाच्या जिवावर केले?? या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी आम्ही किल्ले चंद्रगड (उर्फ़ ढवळ्यागड) दुर्ग भ्रमंती करायचे ठरवले...... आणी भ्रमंती करून आल्यावर आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.

����������������������

काल रविवार.... ऑफिस ला सुट्टी होती मग आमचा दुर्ग भ्रमंतिचा प्लान सुरु झाला. तसे पाहता जावळिच्या खोर्यातिल हा माझा पहिलाच ट्रेक होता त्यामुळे उत्कंठा पण शिगेला पोहोचलेली...
आमचे मित्र सदाशिवगड संवर्धन समितीचे अध्यक्ष शिवश्री. रोहित माने, आमचे हितचिंतक शिवश्री. नितिन लोखंडे व आमचे तासगाव चे नविन दुर्गप्रेमी मित्र शिवश्री. सागर पाटिल यांना फोनवरून कल्पना देवून आम्ही रविवारी सकाळी लवकर जायच ठरवल...

����������������������

रविवार उजाडला पाहटेपासुन आमची जायची तयारी सुरु झाली. 5 वाजता बैग भरुन आम्ही प्रस्थान केले. कराड मधे सगळे एकत्र जमलो व निघालो... पहाटेची थंडी अनुभवत आम्ही महाबळेश्वर मधे पोचलो. इथे मात्र थंडी मुळे खुप हाल झाले परंतु जसे पोलादपुर मार्गे जायला आम्ही घाट उतरायला लागलो तस तसे थंडी कमी जाणवायला लागली. चोहोबाजुनी सह्याद्रिचे कातळ कड़े, हिरवागार निसर्ग , व त्या डोंगराआडून दिसणारी किल्ले प्रतापगड ची माची बघून मन भरुन आले.....
अखेर आम्ही घाट उतारून कापडे फ़ाट्यावर पोहोचलो. तेथे पाण्याच्या बोटल्स घेवुन आम्ही उमरठ गावचा रस्ता विचारत निघालो. उमरठ गाव म्हणजे स्वराज्याचे सेनापती नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मस्थान आहे. ज्या आपल्या बापजादयानि गडातटावरुन इतिहास घडवला , "आदि लगिन कोंढान्याच मग माज्या रायबाच" म्हणत ज्यांनी स्वराज्य निष्ठा दाखवली त्या नरविराच हे गाव. गावात आल्यावर प्रथम समाधी पशी गेलो . येथे तानाजी मालुसरे व शेलार मामा या दोन विरांच्या समाधी आहेत. समाधिपशी नतमस्तक झालो व वीर मशालीच दीप प्रजलन करून पुढे ढवळे गावचा रस्ता विचारत निघालो. जाताना मालुसरेंच्या स्मारकाबाहेर किराना दुकानामधे श्री. पोकळे नावाच्या सद्ग्रहस्थाकडे 1965 साली आम्ब्याच्या झाडाच्या ढोली मधे त्याना 2 तलवारी सापडल्या आहेत त्या आवर्जुन पहाव्यात. त्यापैकी एक मराठा तलवार तर एक दांडपट्टा आहे. तलवारी हातात घेतल्यावर एक वेगलाच अनुभव आला. याच शस्त्राने मावळ्यानि शत्रुचा बीमोड केला होता.

येथून पुढे 5KM वर ढ्वळे गाव आहे. गावातील शाळेत गाड्या लावून आम्ही मंदिराच्या पाठीमागून किल्ल्याला जायला वाट आहे त्यामार्गे निघालो. वाटाड्या घ्यायचाच नाही अशी सगळ्यांचा ठराव झाल्यावर आम्ही गावातील गावकर्यांना माहिती विचारून पायी प्रवास चालु केला. येथून एका डोंगराच्या आडोशाला किल्ले ढवल्यागड असल्यामुळे प्रथम कोळिवस्ती विचारत तेथेपर्यन्त पोहोचलो. कोळी वस्तिपासुन किल्ला दिसायला लागला. किल्ल्याकडे तोंड करून चालायला लागलो, जाताना ओढा लागेल त्या ओढ्यातुन अर्धा तासाची चढ़ाई केल्यावर आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. इथेपर्यन्त येइपर्यन्त अंगातला सगळा त्राण गेला होता. याऊलट खरी चढ़ाई आता सुरु झाली होती. कारण एकतर आम्ही रस्ता चुकलो होतो आणि आमच्या समोर आता फकत काळा कातळ कडा होता. रॉक क्लाइम्बिंग करायच होत पण आमच्याकडे वायर रोप नव्हता. शेवटी रिस्क घेवुन आम्ही वर जायचच ठरवल. खरपाहता हा आमचा निर्णय चुकीचा होता कारण सेफ्टी सामानाशिवाय ट्रेक करणे हे कधीही धोक्याच. थोडा जरी पाय टाकायला चुकला तर मरनार हे निश्चित होत पण दुर्ग प्रेमाने आम्हाला एवढ वेड लावलय की त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार झालो असतो. शेवटी निर्णय झाला व आम्ही ट्रैकिंग ला सुरवात केलि. "सह्याद्री" ही 3 अक्षरे नुसती वाचायला बरी वाटतात पण ते अनुभवल्यावर त्याच खर अक्राळ विक्राळ रूप समजते. काळ्या कातळातले तासिव कड़े , भेभान वारा, व आपल्यासमोर एकच उद्धिस्ट ते म्हणजे कहिहि करून गडावर जायचेच. पुस्तकातल्या निम्म्या प्रश्नांच उत्तर मला मिळाल होत, ते म्हणजे या गडावर सैन्य जरी कमी असल तरीही गडाच्या नैर्सगिक भिषण रुपामुळे गडावर आक्रमण करायलाच कोण धजावनार नाही. निम्म्यात गेल्यावर पाय थरथर कापायला लागले, खाली पाहिले की डोळे फिरायचे 700-800 मीटर खोली, पकडायला जागा कमी, पाय रोवायला खाची पण कमी एवढा तासिव कडा, मध्यात गेल्यामुळे धड उतरुही शकत नव्हतो, पुन्ग्या टाइट झाल्या पण पुन्हा दगडाला ठेपा देत व गवताला पकडून अखेर वर पोहोचलोच. गडावर पोहोचताच मनाची मरगळ आसपासच दृश्य बगुण गायबच झाली एवढ तूफान सह्याद्रीच सौन्दर्य किल्ले ढवळ्यागडावर आपल्याला पहायला मिळते.
ज्या सौंन्दर्या च वर्णन शब्दात कमी पडेल असा निसर्ग खजाना आपल्याला डोळे फाडून बगितल्याशिवाय कोणीही राहणार नाही. येथून गडाच्या उत्तरेकडे चालत जाताना सुरवातीला ढवळ्या महादेवाच शिवलिंग व नंदी दगडात कोरलेला दिसतो. येथे मंदिर कुठेही नाही कारण गडावर वार्याचा वेग असल्यामुळे येथे काहीही टिकू शकत नाही. शिवलिंगापासून पुढे गेल्यावर तटबंदिच्या खाली 5 पाण्याची टाके आहेत, पण येथे पोहोचता येत नाही. येथून पुढे सरळ गेल्यावर आम्ही बालेकिल्ल्यावर गेलो. जाताना रस्त्यामधे एक पाण्याचे टाके लागले पण यामधल पानी पिन्यायोग्य नाही. त्याच्या थोडच पुढे राजवाड्याचे पडलेले अवशेष होते त्याच्या बाजुलाच देवी जननी कमळजा चा चौथरा आहे व दुसरे एक शिवलिंग आहे. शिवलींगासमोर एक दगडी गोळा पडलेला होता.

आणखी उत्तरेकडे चालत गेल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी  व ख़ाली उतरायला पायर्या दिसल्या. तेथून खाली गेल्यावर एक अप्रतिम अस पाण्याच टाक गडाच्या एकदम काठावर कोरलेल आहे ते पाहून त्यामधिल पानी पिलो. पाणी थंड व चवदार होते, तहानच भागली पाण्याने. या टाक्याच समोरच कातळामधे पहरेकर्यानसाठी कोरलेली गुहाही आजही चांगल्या अवस्थेत आहे. हा शेवटचा टप्पा आहे. येथून पायर्यापर्यंत गेल्यावर त्याच्या डाव्या बाजूला 3 टाके आहेत तेही जरुर पहावे......

����������������������

�� इतिहास -

कांगोरी गड चंद्रराव मोर्यांनी जावळीच्या खोर्यात बांधला. त्याचा उपयोग घाटमार्गाच्या संरक्षणासाठी व टेहाळणीसाठी केला गेला. १५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर कांगोरी गड, ढवळगड, रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजी सारखा कसलेला योध्दा मिळाला. चंद्रगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून ‘‘गहनगड’’ ठेवले. संभाजी महाराजांचा वध केल्यावर औरंगजेबाने इतकादरखान उर्फ जुल्फीकारखानास रायगड घेण्यास सांगितले. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च १६८९ मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला. त्यावेळी मंगळगड मोघलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी ‘मंगळगड’जिंकून घेतला. इ.स १८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर वमॉरीसन या इंग्रज अधिकार्यांना अटक करुन मंगळगडावर तुरुंगवासात ठेवले होते. इ.स १८१८ मध्ये कनेल पॉथर या इंग्रजाने हा किल्ला जिंकला.

����������������������

��कसे जाल-

महाबलेश्वर मधून पोलादपुर रोडला 43 km वर कापड़े फाटा लागतो तेथून उजव्या बाजूने आत वळुन उमरठ गावचा रोड विचारावा. उमरठ पासून 7 km वर ढवळे हे गडाच्या पायथ्याच गाव आहे.

����������������������

�� जय जीजाऊ
�� जय शिवराय
�� जय रौद्र शंभो

��माहिती संकलन आणि लेखन-

��स्वराज्य योद्धा ट्रेकर्स��

शिवछावा- मनोज शिवाजी महाडिक
"स्वराज्य" शिवशक्ति चौक , नेवरी.
ता. कडेगाव जि. सांगली 415311
मो. 9156571313 / 9890354353
मेल- manoj.swarajya96@gmail.com

©सर्व माहिती व फोटो संरक्षित

मंगळवार, १० मार्च, २०१५

स्थापत्य कलेचा ग्रीष्मा- किल्ले दातेगड

�� वास्तुकलेचा अविष्कार- किल्ले दातेगड

����������������������

आजच्या चालू काळातिल प्रगत तंत्रज्ञान त्याकाळी नसतानाही वास्तु कलेचा अप्रतिम नजारा आपल्याला किल्ले दातेगडावर पाहायला मिळतो. अतिशय कोरीव व अवाढव्य काम आपल्याला किल्ले कलानिधीगडासारखे किल्ले दातेगडावर पहायला मिळते.

����������������������

पाटन पसल्या या किल्ल्याबाबत खुप ऐकून होतो. आड़ वाटेला असलेल्या या किल्ल्याला पर्यटकांची तसेच दुर्ग वेड्यांची वर्दळ कमीच असते. या किल्ल्याला तसा जास्त इतिहास लाभलेला नाही किंवा या किल्ल्यावर तसे जास्त पाहन्यासारखेही नाही असा कदाचित यामागचे कारण असेल पण छत्रपतिंच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्यावरच देखन बांधकाम बघून कोणालाही शिवकाळातिल लोकांचा हेवा वाटेल...

����������������������

किल्ले दातेगडाचा इतिहास सर्व वाचून आम्ही दातेगडाला जाण्यासाठी निघालो. कराड हुन पाटन मधे पोहोचलो. पाटन मधून टोळेवाडी चा रस्ता विचारत आम्ही निघालो. पाटन ते टोळेवाडी अन्तर 10 KM च्या आसपास आहे. घाटातुन वर गेल्यावर आपल्याला टोळेवाडी च्या अलीकडे एका रांगेत 3 डोंगर रांगा दिसतील, त्यापैकी मधला डोंगर म्हणजेच किल्ले दातेगड होय...

����������������������

रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाल माती, हिरवेगार जंगल पाहत आपन किल्ले दातेगडाच्या पायथ्याशी असलेल्या स्वागत फलाकापशी थाम्बावे. येथे गाड़ी लावून घनदाट झाडीतील पाउलवाट पकड़ावी. अर्ध्या तासाच्या चढ़ाई नन्तर आपण किल्ल्याच्या पुर्वेकड़ील बाजुस तटबंदीवर पोहोचतो. येथून आजुबाजुचा परिसर न्याहाळुन सरळ पुढे जावे, येथे आपल्याला गडावरील दक्षिण दरवाजा दिसेल. पायर्या उतरून खाली गेल्यावर भुकंम्पामधे पड्झड झालेला दरवाजा दिसेल. दरवाज्याच्या समोरच पूर्वेला तोंड करून गणपतीची व दक्षिणाभिमुख मारुती दगडात कोरलेले दिसतील, यांची उंची सरसरी 8-10 फुट आहे. परत आलेल्या वाटेने पायर्या चढून वर गड्माथ्यावर जायचे. इथून डाव्या बाजूने पुढे गेल्यावर एक नागमोडी 15 फूटी रुंद चर दिसेल. ही चर नसून या गडावरच वैभव आहे म्हणजेच 30 मिटर खोली असलेली विहीर आहे. वास्तुकलेचा अविष्कार हा येथेच पहायला मिळतो..

����������������������

विहिरीत उतरायला पायर्या आहेत. विहिरीत उतरत असताना डाव्या बाजूला देवडि आहे. देवडिमधे महादेवाची पिंड असून समोर नंदी आहे. येथून खाली उतरत जावे.... जसे जसे खाली जावे तसा तसा थंडावा जाणवेल.विहिरीत बारमाही पाणी असते पण ते सध्या पिण्यायोग्य नाही. विहिरीत प्रकाशासाठी 2 झरोखे आहेत..

विहिरीतून बाहेर पडल्यावर पश्चिमेकडे चालत जावे तेथे आपल्याला 3 पाण्याचे टाके दिसतील, याची खोली सरासरी 8-10 फुट आहे. टाक्यात सध्या पाणी नाही. या 2 देखण्या वास्तु व्यतिरिक्त गडावर दुसरे काही पाहन्यासारखे म्हणजे गडाची तटबंदी , पडलेले बांधकाम दिसेल.

����������������������

��कसे जाल- कराड पासून पाटण गाठावे. पाटन मधून टोळेवाडिचा रोड विचारावा....

����������������������

��जय जीजाऊ
�� जय शिवराय
�� जय रौद्र शंभो

��माहिती संकलन आणि लेखन-

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

शिवछावा- मनोज शिवाजी महाडिक
"स्वराज्य" शिवशक्ति चौक , नेवरी.
ता. कडेगाव जि. सांगली 415311
मो. 9156571313 / 9890354353
मेल- manoj.swarajya96@gmail.com

©सर्व माहिती व फोटो संरक्षित

गुरुवार, ५ मार्च, २०१५

किल्ले चंदन वंदन भ्रमंती

��भ्रमंती किल्ले चंदन-वंदन ची��
             ( 2 मार्च 2015)

��������������������

1 मार्च च्या वरुण राजाच्या अवेळी पराक्रमाने सगळ्याचीच धावपळ उडाली. वातावरणात थंडावा असल्यामुळे आम्ही आमच्या दुर्ग प्रेमी मित्रांबरोबर किल्ले चंदन वंदन ला जायचे ठरवले. पण पावसामुले आमचा प्लान फिस्कटला होता. पण आम्ही दुर्गवेडे निसर्गापुढे कसली हार मारणार.....

��������������������

2 तारखेला जायचा परत प्लान झाला. वातावरणात थंडावा होता त्यामुळे प्रवास करताना काही त्रास झाला नाही. माझा एक सोबती कायम तयार असतो तो म्हंनजे यामाहा चा घोडा (R15 ). मनात आले की आम्ही निघालोच.
��������������������

सातारापासुन किल्ला 25 किमी च्या अंतरावर असल्याने सातारा मधे नाष्ठा करून निघालो. भुइंज गावातून कारखान्याकडे निघालो. तेथून किकलि गावचा रस्ता विचारत निघालो. सातारयामधला एवढाच रस्ता छान वाटला अपनाला. दोन्ही बाजुस झाडे, गुलगुलित रस्ते व् शेतामधली हिरवळ पाहून मन प्रसन्न झाले. किकलि गावातून 3 किमी वर बेलमाची गावात आलो. तेथे किल्ल्याच्या पायथ्यापशी एका घराजवळ गाड़ी लावून थोड़ी तेथील रहिवास्याना माहिती विचारून किल्ल्याकडे प्रवास चालू केला.
��������������������

2 भक्कम , काळ्या कातळातले जोड़ किल्ले डोळ्यासमोर होते. मनात भरुन ठेवावे की डोळ्याने पाहून तृप्त व्हावे हेच समजत नव्हते. शेतामधुन वाट काढत भैरोबच्या मंदिरापशी पोहोचलो. मंदिरात अश्वावर आरूढ़ असलेली मूर्ती पाहून गड सर करायला चालू केला. गावातील मुलानी दगड पांढरे केल्यामुळे रस्ता शोधायला जास्त अड़चन पडत नाही. हर हर महादेव चा नारा देत आम्ही गड सर करू लागलो व खिण्डिजवळ येवून थांबलो. 2 किल्ल्याना विभक्त करणारी हीच ती खिंड. खिंडी पासून उजव्या बाजूला वंदन किल्ल्यासाठी जायचे. थोडे चालत गेल्यास आपनला बुरुज दिसेल. बुरुज दिसताच घोषणा देत दक्षिणाभिमुख दरावाज्यापशी यायचे. बुरुजाची व् दरवाज्याची बरिचशी पडझड झाली आहे. तरीपण राहिलेले अवशेष चांगल्या अवस्थेत आहेत. दरवाजावर डाव्या बाजुस गणपतीचे शिल्प कोरले आहे तर उजव्या बाजुस नक्षीकाम केले आहे. येथून वर आल्यावर आपन प्रशस्थ अश्या पहारेकर्यांसाठी तयार केलेल्या देवडया पहाव्या. तेथून उजव्या बाजूला जावे. जाताना डाव्या बाजुस काही पडलेले वस्तूंचे अवशेष दिसतील. पायर्या चढून वर गेल्यावर आपन किल्ल्यावर पोहोचतो.
��������������������

किल्ल्यावर पोहोचल्यावर डाव्या बाजुस वास्तूंचे पडलेले अवशेष दिसतील. या सर्व वास्तु एका ओळिमधे व् रस्त्याच्या दोन्ही बाजुस आहेत. तेथून पुढे गेल्यावर अपनाला 3 बिना छप्पराच्या वास्तु दिसतील. तेथून उजव्या बाजूला 2 जोडून असलेले धान्य कोठार/ दारूचे कोठार अजुनही सुस्थितीत आहेत, ते पाहून थोडे पुढे जावे तेथे मधेच आपल्याला एक दगडी चौथरा दिसेल त्यावर 2 पिंडी सारखे कोरीव काम दिसेल. चौथर्याच्या उजव्या बाजुस एका ओळित 4 पाण्याचे तळे दिसतील. पैकी 2 व 4  नंम्बराच्या तळ्यापशि प्राचीन मशिदी आहेत. येथे आजही मुस्लिम बांधव येतात. येथील प्रवेश दारावर फारशी भाषेत काही मजकुर कोरला आहे. डाव्या बाजूला उंचवटयावर काही पडलेले दगडी बांधकाम दिसते.
तसा किल्ला मोठा असल्यामुळे पाहन्यास 1 तास लागतो. किल्ल्यावर भरपूर झाडे वाढल्यामुले सर्व वस्तुं निट पाहता येत नाहीत तसेच किल्ल्यावर माकडांचा वावर असलेमुळे जरा जपून राहावे.
��������������������

��कसे जाल- सातारा पासून 24 Km. सातारा- पुणे महामार्गावरून भुइंज गावात शिरावे तेथून भुइंज च्या कारखान्या पासून किकली गाव 4 Km आहे. किकली गावातून बेलमाची गाव 4 km आहे.

����������������

��जय जीजाऊ
��जय शिवराय
��जय रौद्र शंभो

��माहिती संकलन आणि लेखन-

��स्वराज्य योद्धा ट्रेकर्स....��

शिवछावा- मनोज शिवाजी महाडिक
"स्वराज्य" शिवशक्ति चौक , नेवरी.
ता. कडेगाव जि. सांगली 415311
मो. 9156571313 / 9890354353
मेल- manoj.swarajya96@gmail.com

©सर्व माहिती व फोटो संरक्षित