हरजी राजेमहाडीक व कर्नाटकातील हालचाली (१६८८)
राजेमहाडीक या घराण्याची वंशावळ उपलब्ध आहे.महाराष्ट्र मधील सुर्यवंशीय घराणे आहे.हरजी राजेमहाडीक हे पराक्रमी होते.शहाजीराजांची त्यानी मर्जी संपादन केली होती विजापूरकरानी हरजीराजे यांना (राजे,प्रतापराव, रायातराव) या पदव्या दील्या होत्या . . इ.स. १६६२ साली त्यांना महाराष्ट्रात आणले गेले.शिवाजीराजांशी त्यांचे प्रेम जडले आणि महाराजांनी आपली कन्या अंबिकाराणी हीच्या सोबत इ.स.१६६८ मध्ये विवाह करुन दिला .नंतर हरजी राजे हे कर्नातकात गेले आपल्या पराक्रमाने मराठ्यांचा रुबाब दरारा त्यांनी निर्मान केला .शिवाजी राजांच्या महानिर्वाणानंतर संभाजीराजांचे राज्यप्राप्तीच्या व राज्यारोहणाच्या वेळी ते हरज होते. इ.स.१६८१मध्ये हरजीराजे राजेमहाडीक कर्नातकातचे-जिंजीचे मुख्य कारभारी झाले.त्यावेळी त्यांनी जिंजी राखला म्हणुनच जिंजी नंतर उपयोगि आला मार्टिनच्या दैनंदिनीत म्हतले आहे की हरजीराजे यांना जिंजीचे प्रशासक नेमण्यामागे संभाजीराजांची दुरदुष्टी होती. एक उत्कृष्ट सेनापति म्हणून हरजीराजांचा गौरव भारतातील इतिहासात नोंदविला गेला.जिंजीचे राज्य त्यांनी औरंगजेबाचे आक्रमणापासून वाचवले .म्हैसूर आणि तमिळनाडूचंया उत्तर अर्कातपर्यंत मराठ्यांनी औरंगजबाशी निकराचा सामना दिला .
संभाजीराजांची कन्या भवानीबाई हिचे हरजीराजांचा मुलगा शंकराजी याच्याशी लग्न झाले.त्यानी शाहू महाराजांच्या सुटकेस मदत केली.नंतर शाहूराजांकडुन
कर्नाटकात त्याना कारभार मिळाला व इ.स.१७०९ ला भवानीबाईंना तारळे महालाची सनद देण्यात आली हरजी राजे गोवळकोंड्याकडील प्रदेश स्वराज्यास जोडण्याचा प्रयत्न करीत होते. इ.स.१६८८ च्या जानेवारी मध्ये ५००सैनिकांचे मदतीने कांचीवर गेले.व नंतर मार्च अखेरीस राजे त्रिचनापल्लि ते कांजीवरम या आघाडीवर गेले .त्यांची मुले
प्रतापजी ,दुर्गोजी ,शंकराजी,जयसिंग ,सुभानजी,गुणाजी उदितसिंग.........
_श्रीमंत मराठा सरदार घराणे इतिहासात खुप प्रसिद्ध होते सोळाव्या शतकात हे महाडला आले महाडवरून त्यांना राजेमहाडीक असे आडनाव पडले त्यांचा महापुरूष कृष्णाजीराजे 1614 ला युसूफ आदिलशाच्या लुटालूटीस मरण पावले त्यांच्याकडे दाभोळची मोकदमी होती.
नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरूवात झाल्यावर कृष्णाजींचे बंधू कानोजी यांना मिळाले हे ही 1650 ला युध्दात मरण पावले.त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराज्यांस कर्नाटकात मदत करीत असताना मरण पावले शहाजीराजेंनी हरजीराजेंवर चांगलेच लक्ष होते .
___ मुलगा हरजीराजे राजेमहाडीक हे शिवरायांचे विश्वासू व सरदार होते जी मोहीम द्यावी ती यशस्वी करून येयचे छञपती शिवाजी महाराज यांनी हरजी राजेमहाडीक यांच्या कामगीरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला .
त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने 1668 ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती दिला व विवाह संपन्न झाला पुढे शिवरायांचा मृत्यू 1680 ला झाला या नंतरही ते छञपती संभाजी महाराज यांच्याबरोबर इमानाने वागले दक्षिण भारताची जबाबदारी शिवरायांनी यांच्याकडे ठेवली होती ती संभाजीराजेंनी यांच्याकडेच ठेवली ___.
पुढे हरजीराजे कांचीवर चाल करून गेले त्यांच्या पराक्रमापुढे कांची ही नमली कांची जिंकून घेतली संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर छञपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी हरजीराजेंनी जिंजीत शौर्य पराक्रम गाजवले.
नंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फीफिरखान जिंजीत चालून आल्यावर घमासान सुरू असलेल्या युध्दात 29 सप्टेंबर 1689 ला तोफेचा गोळा लागून जिंजी कर्नाटक येथे वीर मरण आले. _____पुढे सातारहून 20 मैलावर महाडीक इनाम असलेले वतन महाडकांचे असलेले तारळे गावी 1708 ला भेटले व वसवले अंबिकाबाईंचे पुञ शंकरजी राजेमहाडीक यांना छञपती संभाजी महाराज यांची मुलगी भवानीबाई दिल्या होत्या . शंकरजी राजेमहाडीक यांचा युध्दात मृत्यू झाल्या नंतर भवानीबाई तारळे नदीकाठी सती गेल्या..
त्याचे राजेमहाडीक वंशज भानजी हरजी राजेमहाडीक आणि मी ,तारळे.येथे याच्याशी भेट होऊन चर्चा झाली.
स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

सोमवार, १९ मार्च, २०१८
हरजीराजे महाडीक एक पराक्रमी योद्धा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
खूपच माहितीपूर्ण....
उत्तर द्याहटवाHarjirajencha janm kadhi zala hota
उत्तर द्याहटवा