स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

गुरुवार, ५ मार्च, २०१५

किल्ले चंदन वंदन भ्रमंती

��भ्रमंती किल्ले चंदन-वंदन ची��
             ( 2 मार्च 2015)

��������������������

1 मार्च च्या वरुण राजाच्या अवेळी पराक्रमाने सगळ्याचीच धावपळ उडाली. वातावरणात थंडावा असल्यामुळे आम्ही आमच्या दुर्ग प्रेमी मित्रांबरोबर किल्ले चंदन वंदन ला जायचे ठरवले. पण पावसामुले आमचा प्लान फिस्कटला होता. पण आम्ही दुर्गवेडे निसर्गापुढे कसली हार मारणार.....

��������������������

2 तारखेला जायचा परत प्लान झाला. वातावरणात थंडावा होता त्यामुळे प्रवास करताना काही त्रास झाला नाही. माझा एक सोबती कायम तयार असतो तो म्हंनजे यामाहा चा घोडा (R15 ). मनात आले की आम्ही निघालोच.
��������������������

सातारापासुन किल्ला 25 किमी च्या अंतरावर असल्याने सातारा मधे नाष्ठा करून निघालो. भुइंज गावातून कारखान्याकडे निघालो. तेथून किकलि गावचा रस्ता विचारत निघालो. सातारयामधला एवढाच रस्ता छान वाटला अपनाला. दोन्ही बाजुस झाडे, गुलगुलित रस्ते व् शेतामधली हिरवळ पाहून मन प्रसन्न झाले. किकलि गावातून 3 किमी वर बेलमाची गावात आलो. तेथे किल्ल्याच्या पायथ्यापशी एका घराजवळ गाड़ी लावून थोड़ी तेथील रहिवास्याना माहिती विचारून किल्ल्याकडे प्रवास चालू केला.
��������������������

2 भक्कम , काळ्या कातळातले जोड़ किल्ले डोळ्यासमोर होते. मनात भरुन ठेवावे की डोळ्याने पाहून तृप्त व्हावे हेच समजत नव्हते. शेतामधुन वाट काढत भैरोबच्या मंदिरापशी पोहोचलो. मंदिरात अश्वावर आरूढ़ असलेली मूर्ती पाहून गड सर करायला चालू केला. गावातील मुलानी दगड पांढरे केल्यामुळे रस्ता शोधायला जास्त अड़चन पडत नाही. हर हर महादेव चा नारा देत आम्ही गड सर करू लागलो व खिण्डिजवळ येवून थांबलो. 2 किल्ल्याना विभक्त करणारी हीच ती खिंड. खिंडी पासून उजव्या बाजूला वंदन किल्ल्यासाठी जायचे. थोडे चालत गेल्यास आपनला बुरुज दिसेल. बुरुज दिसताच घोषणा देत दक्षिणाभिमुख दरावाज्यापशी यायचे. बुरुजाची व् दरवाज्याची बरिचशी पडझड झाली आहे. तरीपण राहिलेले अवशेष चांगल्या अवस्थेत आहेत. दरवाजावर डाव्या बाजुस गणपतीचे शिल्प कोरले आहे तर उजव्या बाजुस नक्षीकाम केले आहे. येथून वर आल्यावर आपन प्रशस्थ अश्या पहारेकर्यांसाठी तयार केलेल्या देवडया पहाव्या. तेथून उजव्या बाजूला जावे. जाताना डाव्या बाजुस काही पडलेले वस्तूंचे अवशेष दिसतील. पायर्या चढून वर गेल्यावर आपन किल्ल्यावर पोहोचतो.
��������������������

किल्ल्यावर पोहोचल्यावर डाव्या बाजुस वास्तूंचे पडलेले अवशेष दिसतील. या सर्व वास्तु एका ओळिमधे व् रस्त्याच्या दोन्ही बाजुस आहेत. तेथून पुढे गेल्यावर अपनाला 3 बिना छप्पराच्या वास्तु दिसतील. तेथून उजव्या बाजूला 2 जोडून असलेले धान्य कोठार/ दारूचे कोठार अजुनही सुस्थितीत आहेत, ते पाहून थोडे पुढे जावे तेथे मधेच आपल्याला एक दगडी चौथरा दिसेल त्यावर 2 पिंडी सारखे कोरीव काम दिसेल. चौथर्याच्या उजव्या बाजुस एका ओळित 4 पाण्याचे तळे दिसतील. पैकी 2 व 4  नंम्बराच्या तळ्यापशि प्राचीन मशिदी आहेत. येथे आजही मुस्लिम बांधव येतात. येथील प्रवेश दारावर फारशी भाषेत काही मजकुर कोरला आहे. डाव्या बाजूला उंचवटयावर काही पडलेले दगडी बांधकाम दिसते.
तसा किल्ला मोठा असल्यामुळे पाहन्यास 1 तास लागतो. किल्ल्यावर भरपूर झाडे वाढल्यामुले सर्व वस्तुं निट पाहता येत नाहीत तसेच किल्ल्यावर माकडांचा वावर असलेमुळे जरा जपून राहावे.
��������������������

��कसे जाल- सातारा पासून 24 Km. सातारा- पुणे महामार्गावरून भुइंज गावात शिरावे तेथून भुइंज च्या कारखान्या पासून किकली गाव 4 Km आहे. किकली गावातून बेलमाची गाव 4 km आहे.

����������������

��जय जीजाऊ
��जय शिवराय
��जय रौद्र शंभो

��माहिती संकलन आणि लेखन-

��स्वराज्य योद्धा ट्रेकर्स....��

शिवछावा- मनोज शिवाजी महाडिक
"स्वराज्य" शिवशक्ति चौक , नेवरी.
ता. कडेगाव जि. सांगली 415311
मो. 9156571313 / 9890354353
मेल- manoj.swarajya96@gmail.com

©सर्व माहिती व फोटो संरक्षित

२ टिप्पण्या: